आईसह दोन निष्पाप चिमुकल्यांना जिवंत जाळले… मृत महिलेच्या डाव्या हातावर जयभीम नाव गोंदलेल…

0
8

पुणे शिवसत्ता टाइम्स (आनंद पवार):-

शिरूर तालुक्यातील रांजणगाव गणपती परिसरात घडलेल्या तिहेरी हत्याकांडाने संपूर्ण भागात खळबळ उडवली आहे. एका महिलेबरोबरच दोन बालकांचे मृतदेह आढळून आल्यानंतर पोलिसांनी तात्काळ तपासाला सुरुवात केली असून, अद्याप या मृतदेहांची ओळख पटलेली नाही. या घटनेचा तपास पुणे ग्रामीण पोलिसांचे विशेष पथक करत आहे.खंडाळा माथ्याजवळ रांजणगाव गावच्या हद्दीत महिला आणि तिच्या दोन लहान मुलांना अज्ञाताने खून करून पेटवून दिले. या महिलेचे वय अंदाजे २५ वर्षे असून तिच्या लहान मुलांचे वय अंदाजे चार वर्षे आणि दोन वर्षे आहे.

पोलिसांनी घटनास्थळावरून काही पुरावे गोळा केले असून, या हत्याकांडामागील कारणांचा शोध घेण्यासाठी पोलीस विविध शक्यता पडताळून पाहत आहेत. या प्रकरणातील मृतदेहांचे चेहरे ओळखू न येण्यासारखे असल्यामुळे ओळख पटवणे अधिक कठीण झाले आहे.

या हत्याकांड प्रकरणातील मृत महिलेच्या डाव्या हातावर ‘जय भीम’ असे गोंदलेले असून, बदामामध्ये ‘मॉम- डॅड’ असे इंग्रजीत लिहिले आहे. दुसऱ्या हातावरही रंगीत टॅटू काढलेले असून, बदामामध्ये इंग्रजीत ‘आर’ व ‘एस’ ही अक्षरे गोंदवली आहेत. रांजणगाव गणपती हद्दीमध्ये खंडाळे माथा परिसरात एका बंद पडलेल्या कंपनीच्या मागील बाजूस गेल्या रविवारी (ता. 25) वय वर्षे 25 ते 30 वयोगटातील महिला आणि दीड व चार वर्षे वयाच्या दोन मुलांचे मृतदेह आढळून आले होते. खून करून, पेट्रोल टाकून मृतदेह जाळून टाकण्याचा प्रयत्न हल्लेखोराने केला होता. मात्र, पावसामुळे मृतदेह अर्धवट जळाले आणि हे तिहेरी हत्याकांड उघडकीस आले… त्यामुळे या प्रकरणाचा तपास अधिक सखोल करण्यासाठी पोलिसांनी स्थानिक पोलीस पाटील, ग्रामस्थ आणि विविध स्थानिक यंत्रणांची मदत घेण्याचे ठरवले आहे.