वडखळ-अलिबाग रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था… दुरावस्थेबाबत पंडितशेठ पाटीलांची सरकारकडे जोरदार मागणी…

0
14

अलिबाग शिवसत्ता टाइम्स (धनंजय कवठेकर):- 

समृद्धी महामार्गाचे काम पूर्ण झाल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचं कौतुक करताना पंडीत शेठ पाटील यांनी म्हटलं की, “ही एक अशक्य वाटणारी गोष्ट त्यांनी शक्य करून दाखवली आहे. समृद्धी महामार्गामुळे महाराष्ट्राचा विकास अधिक वेगाने होईल, हे निश्चित आहे.

मात्र याच वेळी त्यांनी एक गंभीर मुद्दा उपस्थित करत वडखळ-अलिबाग रस्त्याच्या दुरवस्थेबाबत चिंता व्यक्त केली. पंडित शेठ पाटील म्हणाले, “अलिबाग हे रायगड जिल्ह्याचं मुख्यालय असून येथे अनेक महत्वाची शासकीय कार्यालयं आहेत. जिल्हा रुग्णालय, जिल्हाधिकारी कार्यालय, पोलीस अधीक्षक कार्यालय यांसारख्या सेवा याठिकाणी केंद्रित आहेत. त्यामुळे वडखळ-अलिबाग हा रस्ता अत्यंत महत्वाचा असून, त्यावर प्रचंड वाहतूक दिसून येते.परंतु या रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय आहे.”ते पुढे म्हणाले की, “या रस्त्याबाबत केंद्र आणि राज्य सरकारने पूर्वीच मान्यता दिली आहे. डीपीआर (Detailed Project Report) तयार झालेला आहे, अंदाजपत्रकही तयार झालं आहे, मात्र अद्याप प्रत्यक्षात कोणतीही अंमलबजावणी झालेली नाही..ही एक प्रकारे जिल्ह्याच्या विकासाला आणि नागरिकांच्या दैनंदिन जीवनाला केलेली दुजाभावाची वागणूक आहे.”

पंडीत शेठ पाटील यांनी शासनाच्या दोन्ही स्तरांना केंद्र व राज्य सरकार आवाहन केलं आहे की, लवकरात लवकर वडखळ-अलिबाग रस्त्याचे काम सुरू करून जिल्ह्याच्या विकासाला गती द्यावी. तसेच जनतेच्या सोयीसाठी आणि सुरक्षिततेसाठी या रस्त्यावर तात्काळ उपाययोजना कराव्यात.