बालविवाह करू नका,सहज सेवा फाउंडेशनचा सातत्यपूर्ण उपक्रम… बालवयातील विवाहाने होणारे नुकसान यावर समुपदेशन कार्यक्रम…

0
8

खोपोली शिवसत्ता टाइम्स (खलील सुर्वे):-

समाजातील आदिवासी घटकांमध्ये लैंगिक शिक्षण महत्त्वाची बाब आहे. तसेच बालवयात लग्न झाल्याने पुढील आयुष्यात होणारे नुकसान,सामुदायिक विवाह सोहळ्याचे महत्त्व व गुन्हेगारीला आळा घालणे यासाठी खालापूर तालुक्यातील मिरकूटवाडी, आदिवासी पाडे येथे समुपदेशन कार्यक्रम गुरुवार दिनांक 05 जुन 2025 रोजी उत्साहात पार पडला.
यावेळी सहज सेवा फाउंडेशनच्या महिला अध्यक्षा निलम पाटील यांनी बालवयात लग्न झाल्यास होणारे परिणाम विषद केले तर ऍड.जयेश तावडे यांनी कायद्याच्या बाजू समजावून सांगितल्या.सहज सेवा फाउंडेशनच्यावतीने दरवर्षी २ एप्रिल रोजी सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन केले जाते यात भाग घेण्याचे आवाहन देखील यावेळी करण्यात आले.

यावेळी मान्यवरांनी ऍड.जयेश तावडे यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देताना आपले विचार मांडले. मिरकूट वाडी येथील आदिवासी वाडी येथे वाढदिवसानिमित्त छत्र्यांचे वाटप करण्यात आले.या उपक्रमास सहज सेवा फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ.शेखर जांभळे,सचिव अखिलेश पाटील,खजिनदार संतोष गायकर, महिला अध्यक्षा निलम पाटील, जनसंपर्क प्रमुख जयश्री कुळकर्णी,ऍड जयेश तावडे,ऋतुजा तावडे,सतीश पाटील, पांडुरंग पाटील, सुधीर चौधरी, जयेश पालांडे, प्रशांत पाटील, रोहित नलावडे, शिवतेज तावडे,कुणाल पाटील,आयुष पाटील,ओमकार वाणी,ललित टेकले, मिरकुटवाडी वाडीतील ग्रामस्थ कृष्णकांत पाटील, शंकर वाघमारे, माजी सरपंच भगवान कातकरी, अंकुश वाघमारे उपस्थित होते.अभि ग्रुप,देवन्हावे यांचे विशेष सहकार्य या उपक्रमास लाभले… समाजातील आदिवासी घटक संपूर्णपणे कायद्याचे ज्ञान नसल्याने अनेक वेळा संकटात येत असल्याने बालविवाहाने होणारे दुष्परिणाम टाळण्यासाठी सहज सेवा फाउंडेशनच्यावतीने या उपक्रमात प्रबोधन करण्याचा मानस यावेळी ऍड. जयेश तावडे यांनी व्यक्त केला.