रायगडच्या रोह्यात शिंदे गट-राष्ट्रवादी वाद विकोपाला… समीर शेडगे यांचा मनोज कुमार शिंदे यांच्यावर गंभीर आरोप…

0
9

रोहा शिवसत्ता टाइम्स (अक्षय जाधव):- 

रायगडच्या रोहा तालुक्यात शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील राजकीय वाद चांगलाच पेटला आहे. दोन दिवसांपूर्वी शिंदे गटाने पत्रकार परिषद घेत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यावर टीका केली होती. याला प्रत्युत्तर देताना राष्ट्रवादीने आज पत्रकार परिषद घेत शिंदे गटाची पोलखोल केली. राष्ट्रवादीचे नेते समीर शेडगे आणि माजी उपनगराध्यक्ष महेश कोलटकर यांनी शिंदे गटाचे तालुकाप्रमुख मनोज कुमार शिंदे यांच्यावर गंभीर आरोप केले.यामुळे दोन्ही गटांमधील संघर्ष विकोपाला जाण्याची शक्यता आहे.

समीर शेडगे यांनी पत्रकार परिषदेत थेट मनोज कुमार शिंदे यांच्यावर हल्लाबोल केला. “मनोज कुमार शिंदे यांनी गद्दारी करून शिंदे गटात तालुकाप्रमुखपद मिळवले. त्यांनी माझ्या मार्गदर्शनाखाली काम केले आहे, पण आता त्यांची सुनील तटकरे यांच्यावर टीका करण्याची पात्रता नाही,” असे शेडगे म्हणाले. त्यांनी पुढे गंभीर आरोप करताना सांगितले की,उसर येथे 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या प्रकरणात मनोज कुमार शिंदे यांनी सेटलमेंट करण्याचा प्रयत्न केला..तटकरे साहेबांवर पुन्हा बोलाल तर आम्ही गप्प बसणार नाही,” असा इशारा शेडगे यांनी दिला. तसेच, “नगराध्यक्ष आणि नगरसेवक कोण होणार हे जनता ठरवेल, तुम्ही कोण सांगणारे?” असा टोला त्यांनी शिंदे गटाला लगावला.
पीडित मुलीच्या काकांनीही मनोज कुमार शिंदे यांच्यावर गंभीर प्रश्न उपस्थित केले. “पोलीस निरीक्षकांच्या केबिनमध्ये आरोपीला घेऊन शिंदे यांनी कोणती चर्चा केली?तालुकाप्रमुख असूनही पीडित मुलीला न भेटता त्यांनी आरोपीला का भेटले?” असा सवाल त्यांनी केला. यामुळे शिंदे यांच्या भूमिकेवर संशय निर्माण झाला आहे. माजी उपनगराध्यक्ष महेश कोलटकर यांनीही शिंदे गटाचे नेते महेंद्र थोरवे यांना उद्देशून “बोलताना भान ठेवा,असा सल्ला दिला.

माजी नगराध्यक्ष संतोष पोटफोडे यांनी नाव न घेता शिंदे गटाचे नेते भरत गोगावले आणि महेंद्र थोरवे यांच्यावर टीका केली. “पोलादपूरपासून कर्जतपर्यंत वाल्मीक कराड कोणते नेते तयार करताहेत, त्यांचा इतिहास काढा,”असे ते म्हणाले. तसेच,“समीर शेडगे राष्ट्रवादीत आल्याने शिंदे गटाला पोटदुखी सुरू झाली आहे,”असा टोमणा त्यांनी मारला… राष्ट्रवादीने यावेळी रोहा नगरपालिकेवर आपला झेंडा कायम राहील, असा विश्वास व्यक्त केला.हा वाद आता अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.शिंदे गट आणि राष्ट्रवादी यांच्यातील या पलटवारामुळे रोह्यातील राजकीय वातावरण तापले असून,येत्या काळात याचे पडसाद स्थानिक राजकारणावर पडण्याची शक्यता आहे…