चौक शिवसत्ता टाइम्स (अर्जुन कदम):-
काल रात्री अचानक आलेल्या तुफान पावसाने आणि वादळ वाऱ्याने अनेकांच्या घरांचे नुकसान झाले आहे, तर वावंढळ गावच्या स्मशानभूमी निवारा शेड पूर्णपणे जमीनदोस्त झाली आहे… काही घरांवरती झाडे पडून पत्रे आणि कौले फुटली आहेत.अनेक ठिकाणच्या विद्युत पुरवठा करणाऱ्या वाहिनी,खांब वाकल्याने खाली आल्या असून तुटल्या देखील आहेत.विद्युत पुरवठा खंडित झाल्याने पाणी पुरवठा खंडित झाला आहे…तर रात्रभर वीज पुरवठा नसल्याने वयोवृद्ध आणि लहान मुलांच्या झोपेवर परिणाम झाला असून डास आणि मच्छर यांचे रात्रभर साम्राज्य पसरले होते… तहसीलदार अभय चव्हाण यांच्या सूचनेनुसार सकाळी मंडळ अधिकारी माणिक सानप आणि तलाठी उदयसिंह देशमुख यांनी नुकसान ठिकाणची पाहणी केली आहे…विद्युत वितरण कंपनीचे अभियंता बोधनकर यांनी ही आपल्या टीमसह दाखल होऊन वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.