नागोठणे शहराला जोडणारा वरवटणे नदी पूल बनलाय जीवघेणा… पूल कोणत्याही क्षणी कोसळण्याची स्थानिकांनी व्यक्त केली भीती…

0
4

रायगड शिवसत्ता टाइम्स (धम्मशील सावंत):-  

रायगड जिल्ह्यातील नागोठणे शहराजवळ असणाऱ्या आंबा नदीवरील शिवकालीन वरवटणे पुलाला 445 वर्ष पूर्ण झाली आहेत. हा पूल जुना व जर्जर झाल्याने केव्हाही कोसळून मोठी जीवितहानी होण्याची भीती वर्तवली जातेय.  हा पूल पूर्णपणे दगडाने बांधलेला असून हा पूल कधीही कोसळण्याची भीती इथल्या स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे. कालपासून रायगड मध्ये कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे हा पूल सार्वजनिक बांधकाम विभाग आणि पोलिसांकडून रहदारीसाठी बंद ठेवण्यात आला होता मात्र पावसाने उघडीप घेतल्याने पुन्हा हा पूल आज वाहतुकीसाठी खुला करण्यात आला असला तरी वाढत्या पावसाच्या जोरामुळे पुन्हा कधीही हा पूल बंद होण्याची शक्यता नाकारता येत नाही.शाळकरी विद्यार्थ्यांसह स्थानिकांना सुद्धा अशा परिस्थितीत 5 किमीचा वळसा घालून जाव लागत.