अलिबाग शिवसत्ता टाइम्स (धनंजय कवठेकर):-
मावळमधील कुंडमळा येथे पूल कोसळल्याच्या घटनेनंतर,राज्यातील सर्व जुने आणि जीर्ण पूल सार्वजनिक करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.नागरिकांनी यासंदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाकडे तक्रारी केल्या होत्या, मात्र दुर्लक्षित केल्यामुळे ही दुर्घटना घडल्याचे बोलले जात आहे. या पार्श्वभूमीवर,तातडीने रायगड जिल्ह्यातील सर्व पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याची आणि आवश्यकतेनुसार दुरुस्ती किंवा पुनर्बांधणी करण्याची मागणी पंडितशेठ पाटील यांनी केली आहे.
रायगड जिल्ह्यातील पाच-सहा वर्षांपूर्वीचे सर्व ब्रीज हे सार्वजनिक करण्याची मागणी पंडितशेठनी रायगड जिल्हा प्रशासनाला केली आहे…कारण ब्रिज पडल्यानंतर त्यात अनेक जण मृत्युमुखी झाले आहेत…घटना घडल्यानंतर यंत्रणा जागी होते… त्यामुळे पंडीत पाटील यांनी जिल्हा प्रशासनाला मागणी केली आहे कि, रायगड जिल्ह्यातील ऑडिट केलेले जे ब्रिज आहेत ते सर्व सार्वजनिक करून लोकांना अलर्ट करा त्यामुळे भविष्यात घडणाऱ्या दुर्घटना टळल्या जातील आणि जीवित हानी व अनेक कुटुंब उध्वस्त होण्यापासून वाचतील…
रायगड जिल्हा हा औदयोगिक जिल्हा असल्याने अनेक अवजड वाहने या जिल्ह्यात फिरत असतात… ब्रिजची कामे ही अनेक वर्षांपूर्वीची असल्याने जिल्ह्यात पुण्यासारखी आणि गुजरात सारखी घटना घडू नये म्हणून जिल्हा प्रशासनाने तात्काळ यावर नियंत्रण करावे व संबंधित अधिकाऱ्यांना कामाला लावण्याची मागणी पंडीत पाटील यांनी केली आहे…