महाड शिवसत्ता टाइम्स (निलेश लोखंडे):-
कोकण मराठी साहित्य परिषद शाखा महाडची साहित्यिक सभा दि.१८ जून २०२५ रोजी शाखेच्या ज्येष्ठ सदस्या कवयित्री लेखिका आणि माजी नगरसेविका सौ पद्मा शिपुरकर यांचे निवासस्थानी शाखेचे अध्यक्ष श्री गंगाधर साळवी यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या उत्साहात संपन्न झाली. सदर सभेस कोकण साहित्य भूषण श्री प्रभाकर भुस्कुटे गुरुजी,जिल्हाध्यक्ष श्री सुधीर शेठ, जिल्हा समन्वयक श्री अ.वि. जंगम सर, जिल्हा वांग्मयीन समिती सदस्या स्नेहा गांधी,जिल्हा प्रतिनिधी श्री नरेंद्र महाडिक,डॉ.चंद्रशेखर दाभाडकर,जॉन्सन डिसोजा सर यांच्यासह शाखेचे पदाधिकारी व सदस्य बहुसंख्येने उपस्थित होते. सचिव श्री दीपक सकपाळ यांनी सभेची सुरुवात केल्यानंतर प्रास्ताविकामध्ये अध्यक्ष श्री गंगाधर साळवी यांनी सर्व उपस्थित सभासदांचे स्वागत केले व मागील महिनाभरात ज्या ज्या सदस्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली अशा सदस्यांचे अभिनंदन केले. यामध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय महाड विकास समिती सदस्य म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल सौ पद्मा शिपुरकर,रायगड जिल्ह्याच्या सोळा शाखांचे लेखापरीक्षण अहवाल,वार्षिक साहित्यिक उपक्रम अहवाल,सर्व शाखा सदस्य यादी इत्यादी परिपूर्ण केल्याबद्दल जिल्हाध्यक्ष श्री सुधीर शेठ, रोटरी क्लब ऑफ रायगड फोर्ट महाड शाखेच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल श्री जॉन्सन डिसोजा तसेच नवीन सभासद श्री जितेंद्र ओक यांचे विशेष सत्कार करण्यात आले. सदर सभेत महाड शाखेचे ज्येष्ठ मार्गदर्शक आणि सुंदर हस्ताक्षराचे धनी कै.सुरेश हरवंदे यांच्या ५ जुलै रोजी असलेल्या स्मृतिदिनी कलारंग पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात येते. या दिवशी शब्दव्रती हा कार्यक्रम आयोजित करून सर्व रसिकांस एक निराळा साहित्यानंद देऊन कै.हरवंदे यांना अभिवादन करण्याचे सर्वानुमते ठरले. या कार्यक्रमाविषयी श्री सुधीर शेठ यांनी सविस्तर माहिती दिली. वार्षिक वर्गणी प्रत्येकी ५०० रुपये जमा करण्याचे ठरले. प्रेमसागर मेस्त्री सर यांच्या मार्गदर्शनाखाली यावर्षीची वर्षा सहल सर्वे आदगाव या ठिकाणी रविवार दिनांक २० जुलै २०२५ रोजी आयोजित करण्याचे सर्वानुमते ठरले. श्री गंगाधर साळवी यांच्या ‘तयांस वंदितो मी’ या दुसऱ्या कवितासंग्रहाचे प्रकाशन २० मे रोजी झाले. या कविता सर्वसमावेशक असून अतिशय दर्जेदार असा कवितासंग्रह आणि त्याचा प्रकाशन सोहळा आयोजित करण्यात आला होता. त्यासंबंधी जिल्हा समन्वयक अ वि जंगम सर यांनी सकारात्मक अभिप्रायपर मनोगत व्यक्त केले आणि साळवी यांचे अभिनंदन केले. तर जिल्हाध्यक्ष श्री सुधीर शेठ यांनी पुस्तकाविषयी आपले मत मांडले. तीन तास मधुभाईंच्या पुस्तकांचे अभिवाचन केल्याबद्दल खुद्द आदरणीय मधूभाईंनी महाड शाखेचे विशेष कौतुक केले, असे श्री सुधीर शेठ म्हणाले. अर्जुन कानू भोई हे पुस्तक १० सप्टेंबर २०२५ रोजी प्रकाशित होणार आहे. याविषयी श्री प्रभाकर भुस्कुटे गुरुजी यांनी माहिती दिली. ‘वेडा पाऊस’ या विषयावर श्री सुधीर शेठ यांनी चारोळी,श्री डिसोजा सर(कविता),डॉ.शितल मालुसरे(कविता), प्रतीक्षा नगरकर(गझल),मनोज खांबे (अज्ञात कवींची कविता),मंगेश कंक(संदीप खरे यांची कविता),जितेंद्र ओक यांनी वृत्तबद्ध कविता,पद्मा शिपुरकर(कविता) अशा प्रकारे कविता सादरीकरण झाले. युवा अध्यक्षा संध्या पोटफोडे,सहकार्यवाह योगेश देवघरकर,प्रिया शहा,स्नेहा काळे,सुधीर सकपाळ,मनोज खांबे,उमेश मिंडे,शामला हरवंदे,रश्मी जंगम, मुग्धा सागवेकर,यांनी चर्चेत सहभाग घेतला. आभार प्रदर्शन यजमान सौ पद्मा शिपुरकर यांनी मानले. उपस्थित प्रत्येक सदस्यास वृक्ष रोप भेट देऊन सन्मानित करण्यात आले. यजमान श्री व सौ शिपुरकर यांचे वतीने रुचकर स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले होते. सभेचे छान आयोजन आणि नियोजन केल्याबद्दल उपस्थित सर्वांनी सौ पद्मा शिपुरकर आणि श्री संतोष शिपुरकर यांचे विशेष आभार मानले.