मुंबई शिवसत्ता टाइम्स (वार्ताहर):-
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक पक्ष आपली पोळी कशी भाजेल, लोकांच्या मनात स्थान कसे निर्माण होईल व अधिकाधिक मते कशी प्राप्त होतील या दिशेने चोख काम पार पाडण्यासाठी सुरुवात केलेली दिसून येते. विधानसभा निवडणुकीचे राजकीय पक्षांना वेध लागलेले असताना सुद्धा प्रत्येक जण कंबर कसून कामाला लागलेले दिसून येतात. त्याच प्रमाणे महाविकासआघाडी विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागली आहे.आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महायुती विरुद्ध महाविकास आघाडीसाठी दोघांनीही दंड थोपटलेले पाहायला मिळत आहेत. महायुतीच्या पाठोपाठ महाविकास आघाडीनेही आता राज्यभर सभा बैठका संवाद यात्रा सुरू करणार आहे. विधानसभा निवडणुका जसजशा जवळ येताय तसा बैठकांचा जोर ही चांगलाच वाढत चालला आहे. उद्धव ठाकरे यांनी दिल्ली दौऱ्यात अनेक नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्या. या दरम्यान अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली. त्यामुळे आता महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष कामाला लागल्याचे दिसते आहे. विधानसभा निवडणुकीसाठी प्रचाराचा प्लॅनही तयार झाला आहे. महाविकास आघाडी १६ ऑगस्टला प्रचाराचा नारळ फोडणार आहे… तर महायुती २०ऑगस्टला आपला प्रचार सुरू करणार आहे. तर २० ऑगस्टला महाविकास आघाडीचा प्रचाराचा नारळ फुटणार आहे. २० तारखेच्या या सभेला काँग्रेस नेते राहुल गांधी हे देखील उपस्थित राहणार आहेत.विधानसभा निवडणूक काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार गट आणि शिवसेना उद्धव ठाकरे गट एकत्र लढणार आहे. महाविकासआघाडीच्या जागा वाटपाची चर्चा देखील लवकरच सुरु होणार आहे. मुख्यमंत्रीपदाबाबत ही या बैठकीत चर्चा होईल. मुख्यमंत्रीपदाचा चेहरा आधीच जाहीर करणार की ज्याच्या जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री होणार हा फॉर्म्युला वापरणार हे निवडणुकीच्या आधी ठरवले जाऊ शकते.१६ तारखेला महाविकास आघाडीचा मुंबईत मेळावा होणार आहे. त्याआधी उद्यापासून काँग्रेस नेत्यांचा मराठवाडा आणि विदर्भ दौरा सुरु होणार आहे…उद्धव ठाकरे, शरद पवार आणि नाना पटोले या मेळाव्यात मार्गदर्शन करणार आहेत. १० आणि ११ ऑगस्टला काँग्रेस नेते लातूर, धाराशिव, बीड. नांदेड, परभणी, हिंगोलीत दौरा करणार आहेत. १२ ऑगस्टला छत्रपती संभाजीनगर आणि जालन्यात पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत. १३ तारखेला बुलढाणा, अकोला आणि वाशिमध्ये संवाद साधणार आहेत. १४ ऑगस्टला काँग्रेस नेते अमरावती आणि यवतमाळमध्ये असल्याची माहिती समोर आली आहे …