पुणे शिवसत्ता टाइम्स (वार्ताहर):
तीन हजार रूपयांचा चेक, कुकर व साडी मिळणार… अशा भूल थापा देऊन पुणे बालेवाडी येथे लाडकी बहीण योजनेचा इव्हेंट महाराष्ट्रातील अनधिकृत तिघाडी सरकारने सादर केला… अशी जोरदार टीका सोशल मीडियातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस, उपमुख्यमंत्रीअजित पवार यांच्यावर होत आहे… सकाळी ९ वाजल्यापासून ‘लाडक्या’ बहीणींना अंगणवाडी-आशा सेविकांच्या माध्यमातून बोलवून घेतले होते… गरिब, विधवा, वयस्कर महिलांची भरपुर गर्दी जमवली होती… योजनेचे पैसे थेट बॅंकेत काही महिलांच्या खात्यात जमा झाले… मग चेक देण्याचे सांगून गर्दी जमविणे हा राजकीय निर्लज्ज, निलाजरेपण म्हणावा लागेल… असा आरोप काही नेटकऱ्यांचा आहे… मुळात भाजप प्रणित या तिघाडी सरकारने महागाई, बेरोजगारी, महागडे शिक्षण, आरोग्य सेवेची हेळसांड, पेट्रोल-डिझेलचे वाढते दर, महागडे गॅस सिलेंडर…. खराब रस्ते… देऊन लोकांचे हाल केले असताना महिलांना १५०० रुपयांची भीक कशासाठी ? असा सवाल सोशल मीडियातून होत आहे… बोलावलेल्या महिलांना जेवण न देता त्यांची दोन राजगिऱ्याच्या लाडूवर बोळवण करण्यात आली…
गरिबांची मस्करी, त्यांचा राजकीय वापर, आज पहिल्यांदा नाही झाला भारतात… पण निदान गरिबी बघीतलेल्या, एके काळच्या रिक्षा चालक भावाने तरी या गरिब, विध्वा, बहिणींच्या गरिबीचे प्रदर्शन भरवून स्वतःची राजकीय चूल पेटविणे आपेक्षीत नव्हते… अशी प्रतिक्रिया प्रसिद्ध पत्रकार राजू परुळेकर यांची आहे…
स्वतःच्या आईला भेटण्यासाठी जाताना अनेक कॅमेरे घेऊन जाणाऱ्या पंतप्रधानाच्या थेट निगराणीत स्थापन झालेल्या या अनधिकृत सरकारकडून वेगळे वागण्याची आपेक्षा बाळगणेही चुकीचे आहे… असेही पत्रकार राजू परुळेकर म्हणतात…