लाडकी बहिणीच्या बढाया मारणाऱ्या शिंदे सरकारचे वास्तव समोर… रस्त्यासाठी लाखो रुपये खर्चूनही प्रत्यक्षात रस्ताच नाही ? 

0
65

रायगड शिवसत्ता टाइम्स (वार्ताहर):-

लाडके सरकारच्या बढाया मारत हजारो किलोमीटरच्या रस्त्यांचे जाळे विणल्याच्या वल्गना करणाऱ्या शिंदे सरकारचे वास्तव पुन्हा एकदा समोर आले आहे…पेण सुधागडचे विद्यमान आमदार रविशेठ पाटील यांच्या घरापासून निव्वळ चार-पाच किलोमीटरच्या अंतरावर असलेल्या खवसावाडी येथील आंबी राग्या कडू या मृत आदिवासी महिलेचे मृतदेह झोळीत टाकून नेण्याची वेळ आदिवासी बांधवांवर आली आहे…पेण तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत बोरगाव नदीतील खौसावाडी आदिवासीवाडी येथे साठ लाख रुपये खर्चूनही प्रत्यक्षात रस्ताच नसल्यामुळे गुरुवार दिनांक ७ नोव्हेंबर रोजी आंबि राघ्या कडू वय ४२ वर्ष या आदिवासी मृत महिलेचा मृतदेह पेण ते खवसावाडी असे सुमारे पाच किलोमीटर झोळीत टाकून न्यावा लागल्याने आदिवासी समाजाला वालीच उरला नसल्याचे भयाण वास्तव समोर आले आहे…ग्रामसंवर्धन सामाजिक संस्था ही मागील दोनवर्षांपासून खवसावाडी,काजुचीवाडी,केळीचीवाडी, तांबडी,आणि उंबरमाळवाडी या पाचही आदिवासी वाड्यांच्या मूलभूत सुविधांसाठी सातत्याने पाठपुरावा करीत आहे…मागील दोनवर्षांत रायगड जिल्हाधिकारी कार्यालयासह संबंधित सर्व विभाग कार्यालांयावर मोर्चे आंदोलन काढून या आदिवासींच्या वाट्याला आलेला विकासनिधी रायगड जिल्हापरिषद पेण उपविभागाचे अभियंता आणि ठेकेदारांनी गिळंकृत केला असून याबाबतची माहितीच्या अधिकारात माहिती मागवली असतानाही देण्यात आलेली नाही…विशेष म्हणजे याच आदिवासी वाड्यांच्या रस्त्यांसाठी १ जानेवारी २०२४ रोजी पुन्हा एकदा सिद्धिविनायक कन्स्ट्रक्शन या ठेकेदाराला ७ कोटी ६०लाख रुपयांचा ठेका देण्यात आला आहे…मात्र आज १०महिने उलटूनही या रस्त्याचेही काम ठेकेदाराने सुरू केलेला नाही…त्यामुळे येथील आदिवासींना मात्र रस्त्या अभावी वेळेवर उपचार न मिळाल्याने मृत्यूला कवटाळावे लागते…अशा परिस्थितीत पेण सुधागड मतदारसंघाचे विद्यमान आमदार रवींद्र पाटील यांच्या  निवासस्थानापासून चार ते पाच किलोमीटरवर असलेल्या या वाड्यांमध्ये आमदार एकदाही पोहोचले नसल्याचे येथील आदिवासी बांधवांचे म्हणणे असून याबाबत आदिवासी समाजामध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे…