अलिबागची जागा जिंकण्यासाठी जयंत पाटीलांची धडपड…पनवेल,उरणसह सांगोल्याकडे जयंत पाटीलांची पाठ… 

0
51

रायगड शिवसत्ता टाइम्स (वार्ताहर ):-

एकही आमदार नसताना शेकापचे रायगडात आडमुठे राजकारण सुरु आहे… त्यामुळे महाविकास आघाडी धोक्यात आली असून याला कारणीभूत शेकापचे नेते जयंत पाटील असल्याचे बोलले जात आहे…जयंत पाटीलांच्या राजकारणामुळे उरण आणि पनवेलमध्ये महाविकास आघाडीचे नुकसान होणार आहे…त्यामुळे शेकाप नेते जयंत पाटील राजकीय खेळ्या करीत आहेत…उरणवगळून अलिबाग,पनवेल आणि पेणच्या जागांवर चर्चा होऊ शकते…अशी भूमिका घेणाऱ्या शिवसेना ठाकरे गटाने जयंत पाटील यांच्या सुनेच्या विरोधातील उमेदवारी मागे घेतली… पनवेल आणि उरणची उमेदवारी घोषित करून लढा देण्यास सांगणाऱ्या जयंत पाटील यांनी आपल्या घरातील उमेदवारी सुरक्षित केली…आणि पनवेल,उरणच्या नेत्यांचा विश्वासघात केला…अशी चर्चा महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये सुरु आहे…शिवसेनेने उरणच्या जागेसह पनवेल,पेण,अलिबाग येथील जागांवर दावा केला होता… मात्र शेवटच्या  क्षणापर्यंत प्रीतम म्हात्रे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला नाही…प्रीतम म्हात्रेना जर विधानसभा निवडणूक लढायची होती … तर त्यांनी पनवेलमधून निवडणुकीला उभे राहायला पाहिजे होते… मात्र ते उरणमधून उभे राहिले आहेत… या अशा राजकारणामुळे महाविकास आघाडीला धोका निर्माण झाला आहे… आणि म्हणूनच पनवेलच्या महाविकास आघाडीचे देखील गणित फिसकटले… अलिबागमधून शिंदे गट शिवसेनेचे महेंद्र दळवी यांच्या विरोधात ठाकरे गटाचे सुरेंद्रदादा म्हात्रे हे निवडणुकीच्या रींगणात होते…मात्र शेवटच्या दिवशी सुरेंद्र म्हात्रे यांनी अर्ज मागे घेतला.. यामुळे शेकापचे जयंत पाटील यांच्या सुनबाई चित्रलेखा पाटील यांची शिवसेनाविरोधातील लढाई सोपी झाली आहे…शेकापचे जयंत पाटील यांनी पनवेल,उरण,आणि पेणच्या जागेच्या मोबदल्यात अलिबागची जागा आपल्या सुनेसाठी पदरात पाडली… अशीच चर्चा सुरु आहे…पनवेल,उरणच्या कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी देखील जयंत पाटील फिरकलेले नाही…त्यामुळे त्यांनी स्वतःच्या भविष्यातील विधानपरिषदेच्या सोयीसाठी सुनबाईंना महाविकास आघाडीतून अलिबाग विधानसभा जागा मिळण्यासाठी ही विचित्र राजकीय खेळी केली आहे…