विधानसभा निवडणुकीत मतदारांचा टक्का कसा वाढला?…मतदानापेक्षा मोजणीत जास्तीची मते कशी आली ?…

0
48

 उरण शिवसत्ता टाइम्स (वार्ताहर):-

विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीला बहुमत मिळाले तर महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला. महायुतीला बहुमत मिळाल्यानंतर राज्यात महायुतीचे सरकार लवकरच स्थापन होईल…सध्या सरकार स्थापनेच्या हालचाली सुरु आहेत…मात्र,असे असतानाच महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून मतमोजणी संदर्भात अनेक प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत…तसेच या निवडणुकीत मतदारांचा टक्का कसा वाढला? याबाबतही काही नेत्यांनी शंका उपस्थित केल्या आहेत…विधानसभा निवडणुकीचा मतदारांचा डेटा,प्रत्यक्षात झालेले मतदान आणि मिळालेल्या मतांमध्ये फरक आढळून दिसून येत आहे…उरण विधानसभा मतदारसंघात २ लाख ६२ हजार ७४७ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला होता. मात्र मतमोजणीच्या वेळी चक्क २ लाख ६३ हजार ५४८ मते असल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे ८०१ वाढीव मते नेमकी आली कुठून, असा सवाल शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) केला असून ईव्हीएमचा हा झोल उघड करण्यासाठी फेरमतमोजणी करा अशी मागणी केली आहे. यासाठी निवडणूक आयोगाकडे फेरतपासणी शुल्कापोटी ८ लाख २ हजार ४०० रुपये भरले आहेत…विधानसभा निवडणुकीत खोके सरकारविरोधात लाट असताना निकाल मात्र उलटच लागला…खुद्द भाजप,शिंदे देखील राक्षसी बहुमत मिळेल असे वाटले नव्हते. ईव्हीएमच्या कृपेनेच झाल्याचा आरोप होत असताना उरणमध्ये ईव्हीएममध्ये घोटाळा झाल्याचे आकडेवारीवरून समोर आले आहे. उरण विधानसभा मतदारसंघात एकूण ३ लाख ४२ हजार १०१ मतदार आहेत. त्यापैकी २ लाख ६२ हजार ७४७ जणांनी मतदानाचा हक्क बजावला. मात्र मतमोजणी झाल्यानंतर झालेले मतदान आणि मोजणीतील मतदान यामध्ये ८०१ मते वाढीव निघाल्याचे समोर आले आहे…याबाबत महाविकास आघाडीचे उमेदवार व शिवसेनेचे जिल्हाप्रमुख मनोहर भोईर यांनी ईव्हीएम सेट सी, व्ही अॅक्टिव्हीटी २७ बी यू, १७ सी यू आणि १७ व्हीव्हीपॅटनुसार फेरतपासणी करण्यासाठी जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांकडे मागणी केली आहे. यासाठी ८ लाख २ हजार ४०० रुपयांचे शुल्क भरले आहेत…