खारघर शिवसत्ता टाइम्स (वार्ताहर ) :-
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत पराभव झाला असला तरी कुणीही खचून जाऊ नका. मतदारांना पैशांची व अन्य आमिषे दाखवून ही निवडणूक शिंदे व भाजपच्या लोकांनी जिंकली आहे, पण शेवटी विजय हा सत्याचाच होणार असून शिवसैनिकांनी यापुढे जोमाने कामाला लागावे, असे आवाहन शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे रायगड जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांनी केले आहे.
पनवेल विधानसभा क्षेत्रातील शिवसेनेचे सर्व पदाधिकारी, महिला आघाडी व युवासेनेचे कार्यकर्ते यांची आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत बोलताना घरत यांनी सांगितले की, केवळ पनवेलमध्येच नाही तर महाराष्ट्रातील अनेक मतदारसंघांमध्ये ईव्हीएमचा घोटाळा झाला असून त्यामुळेच आपल्याला पराभवाला सामोरे जावे लागले. मात्र कुणीही या पराभवाने खचून जाऊ नये. आगामी महापालिका व अन्य निवडणुकांमध्ये पूर्ण ताकदीनिशी शिवसेना उतरणार असल्याची ग्वाही देखील शिरीष घरत यांनी दिली. या बैठकीला शिवसेना रायगड जिल्हा सल्लागार शिरीष बुटाला, जिल्हा समन्वयक व निरीक्षक अनिल चव्हाण, उपजिल्हाप्रमुख भरत पाटील, विधानसभा संघटक दीपक निकम, विधानसभा समन्वयक प्रदीप ठाकूर, उपजिल्हा संघटक अॅड. प्रशांत अनगुडे, महानगर समन्वयक दीपक घरत, तालुकाप्रमुख संदीप तोडेल, तालुकाप्रमुख ज्ञानेश्वर बहे, युवासेना सहचिव अवचित राऊत, जिल्हा युवाधिकारी पराग मोहिते, महिला आघाडीच्या उपजिल्हा संघटक रेवती सकपाळ, विधानसभा संघटक सुजाता कदम, महानगर संघटक लीना गरड, तालुका संघटक अनिता डोंगरकर, प्रेमा अप्पाचा आदी उपस्थित होते…
Home पनवेल / उरण / रायगड पराभवाने खचून जाऊ नका,जोमाने कामाला लागा…जिल्हाप्रमुख शिरीषदादांनी पदाधिकाऱ्यांची घेतली बैठक…