रायगड शिवसत्ता टाइम्स (वार्ताहर):-
मुख्यमंत्र्यांच्या शपथविधी सोहळ्यामुळे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमीवर अभिवादन करण्यासाठी आलेल्या ५ लाख अनुयायी यांच्याकडे महानगरपालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत असून, प्रचंड हाल होत आहेत… त्यामुळे प्रशासनाचा जाहीर तीव्र निषेध करण्यात येतोय… डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करायला आलेल्या अनुयायी यांचे प्रचंड हाल होत असून जेवण, पाणी, शौचालय फक्त कागदावरच असलेले दिसून येत आहे… याचा भीम आर्मीने अधिकाऱ्यास घेराव घालून निषेध केला…. लवकरात लवकर व्यवस्था करावी अन्यथा मुख्यमंत्री तसेच मंत्री, आमदार, खासदार यांना चैत्यभूमीवर अभिवादन करू देणार नाही असा इशारा भीम आर्मीने दिलाय…
चैत्यभूमीवर दिनांक ३/१२/२४ रोजी ५ लाख अनुयायी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी पोहचला आहे… परंतु महानगरपालिका तसेच प्रशासनाकडून अनुयायींसाठी पिण्याचे पाणी नाही, जेवणाची व्यवस्था नाही, शौचालयाची व्यवस्था नाही, आरोग्याची काळजी घेण्यासाठी व्यवस्था नाही… महिला, लहान मुले यांचे प्रचंड हाल होत आहेत… महानगरपालिकेच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी शिवाजीपार्क मैदानात घेराव केला, प्रश्न विचारले असता त्यांच्याकडे काहीही कागदी पुरावा नाही, उत्तर नाही.. आणि BJP महापरिनिर्वाण दिनाच्या पूर्वसंध्येला आपली स्वतःचे सरकार बनवण्याच्या घाणेरड्या राजकारणात व्यस्त आहेत… डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाचा विसर पडलेला आहे… महानगरपालिका प्रशासनाचा तसेच BJP चा तीव्र निषेध केला जात आहे… लवकरात लवकर व्यवस्था केली नाही तर ६ डिसेंबर रोजी एकही मंत्र्यांना, आमदार खासदारांना अभिवादन करू देणार नाही असा इशारा देण्यात आला आहे…