रेवाळजेजवळ कुंडलिका नदीत चारजण बुडाले…दोघांचे मृतदेह शोधण्यास बचाव पथकाला यश…

0
41

रायगड शिवसत्ता टाइम्स (अमूलकुमार जैन, रेश्मा माने):- 

रायगड जिल्ह्यातील मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील माणगाव तालुक्यातील रेवाळजे गावानजीक असलेल्या कुंडलिका नदीतील पाण्याचा अंदाज न आल्यामुळे एक मुलगा व तीन महिलाचा बुडाल्या असून त्यापैकी दोन जणांचे  मृतदेह शोधण्यास बचाव पथकाला यश आले असून इतर दोघांचा शोध बचाव पथक घेत आहेत….

कुंडलिका नदीच्या पाण्याचा अंदाज न आल्याने चौघांचा बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना रायगडमधील माणगाव तालुक्यातील रेवाळमध्ये घडली… बुडणाऱ्या मुलाला वाचवण्यासाठी पाण्यात उतरलेल्या तीनही महिलांचा मृत्यू झालाअसून आतापर्यंत यापैकी दोघांचा मृतदेह पाण्याबाहेर काढण्यास बचाव पथकाला यश आले आहे….  सिद्धेश राजेंद्र सोनार (21), सिद्धी गोपीचंद पेडणेकर (16), काजल सोनार (26) आणि सोनी सोनार (27) अशी मृतांची नावे आहेत… मृत सर्वजण नवी मुंबईतील रहिवासी असून शिरवली येथे आजीच्या गावी आले असता हा दुर्दैवी प्रसंग घडला…
हे सर्वजण नदीवर पोहण्यासाठी गेले असता खोल पाण्याचा अंदाज न आल्याने हा प्रकार घडल्याची प्राथमिक माहिती आहे…  यापैकी सिद्देश सोनार हा मुलगा पाण्यात पडला असता या तीन महिला त्याला वाचवण्यासाठी पाण्यात उतरल्या….  त्यानंतर या चौघांचाही बुडून मृत्यू झाला… माणगाव उपजिल्हा रुग्णालयात मिळालेल्या दोघांना शव विच्छेदनासाठी दाखल करण्यात आले आहे… तर काजल सोनार (26) आणि सोनी सोनार (27) यांचे मृतदेह शोधण्यात येत आहेत….