महाड शिवसत्ता टाइम्स (रेश्मा माने):-
प्रत्येक व्यक्तीला जसं हवं तसं जगण्याचा अधिकार आहे. देशाच्या संविधानाने त्याला तसा अधिकार दिला आहे. ती व्यक्ती आपल्या इच्छेनुसार कुणावरही प्रेम करु शकते किंवा कुणासोबतही राहू शकते. पण काहींना ही गोष्ट रुचत नाही. विशेषत: ग्रामीण भागातील नागरिकांना काही गोष्टी पटत नाहीत. त्यातूनच काही धक्कादायक घटना समोर येतात. पर्यटन स्थळ म्हटले की अनेक ठिकाणांहून विद्यार्थी पर्यटन स्थळ बघण्यासाठी येत असतात परंतु जळगाव जामनेर येथून एका शैक्षणिक संस्थेची सहल किल्ले रायगड पाहण्यासाठी आले होती…रायगडावरून खाली उतरल्यानंतर परतत असताना एक विद्यार्थिनी गाडीमध्ये कमी असल्याचे शिक्षकांच्या निदर्शनास झाले. सदर विद्यार्थिनीने आपल्या सोबत असलेल्या मैत्रिणींना तुम्ही पुढे व्हा मी मागून येते असे सांगितले होते. एक विद्यार्थिनी कमी असल्याचे निदर्शनास येतात शिक्षकांचे देखील धाबे दणाणले…परंतु घटनास्थळी आलेल्या पोलिसांनी प्रियकराबरोबर सदर विद्यार्थिनीला सोबत घेऊन जाणार जामनेरहुन आलेला तेजस पाटील हा पुण्याच्या दिशेने जात असताना मोबाईल लोकेशनच्या आधारे पोलिसांनी तेजस पाटील याला ताब्यात घेतले असून महाड तालुका पोलिसांनी तेजस पाटील याच्यावर अपहरणाचा गुन्हा दाखल केला असून पुढील चौकशी सुरू केली आहे… असे महाड तालूका पोलीस ठाण्याचे अधिकारी यांनी सांगितले आहे…