कोकणात वैदिक देवा-ब्राह्मणाशिवाय लग्न…भटजी नाकारला… शिवराय,फुले,शाहू,आंबेडकर यांची पूजा करून विवाह…

0
68

रत्नागिरी शिवसत्ता टाइम्स (वार्ताहर):-

महाराष्ट्र राज्यात सद्य स्थितीत तरुणपिढी आपल्या घरातील धार्मिक कार्य सत्यशोधक आणि शिवधर्म पद्धतीने करताना दिसून येत आहे…यावेळी रीतसर भटजी नाकारला जातो…असेच कोकणात एक लग्न वैदिक देवा-ब्राह्मणाशिवाय पार पडले आहे…लग्नानंतर सत्यनारायण पूजा नाकारून बळीराजा पूजन करण्यात आले…कोकणातील पहिला सत्यशोधक विवाह म्हणून या लग्नविधीकडे पहिले जात आहे… सापुचेतळे, ता. लांजा जि. रत्नागिरी येथे दि.15 डिसेंबर 2024 रोजी पार पडला…नाणिज ता. जि. रत्नागिरी येथील अनिल पांडूरंग कोकरे यांचा ज्येष्ठ पुत्र सत्यशोधक ॠषीकेष याचा विवाह सापुचेतळे,ता. लांजा जि. रत्नागिरी येथील रामचंद्र बाबू गोरे यांची कन्या सत्यशोधिका प्रणाली हीज बरोबर सत्यशोधक पध्दतीने आयोजित करण्यात आला होता. कोकणात सध्या असे सत्यशोधक आणि षिवधर्म पद्धतीने विवाह होत आहेत… वर सत्यशोधक ॠषिकेष व वधू सत्यशोधिका प्रणाली तसेच प्रणालीचे बंधुराज प्रथमेश यांचा संबंध थेट शिव,फुले,शाहू आंबेडकरवादी चळवळीशी असल्यामुळे या युवा युवतीने मनाशी ठाम निर्धार केला होता, की आपला विवाह भटजींच्या संस्कृत मंत्रानी किंवा वैदिक पध्दतीने न होता, तो अवैदिक, भटजी विरहित करायचा.त्यानुसार हा विवाह पार पडला… या तरुणपिढीने शिव,फुले,शाहू,आंबेडकरवादी  विचारवंत तथा सत्यशोधक समाज संघाचे ज्येष्ठ कार्यकर्ते बाळकृष्ण झोरे सर यांच्याशी संपर्क केला…बाळकृष्ण झोरे सरांनी सत्यशोधक समाज संघ महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष  अरविंद खैरनार यांच्याशी संपर्क करून सत्यशोधक विधीकर्ते भगवान रोकडे व साळुबा पांडव सर  यांना विवाहाची कल्पना दिली… त्यानंतर थेट संभाजी नगरहून सत्यशोधक विधीकर्ते भगवान रोकडे व साळुबा पांडव सर सदर सत्यशोधक विवाहासाठी निघाले आणि 15 डिसेंबर 2024 रोजी कोकणातील हा सत्यशोधक विवाह सापुचेतळे, ता. लांजा जि. रत्नागिरी येथे पार पडला.

सदर सत्यशोधक विवाह पाहण्यासाठी पंचक्रोशीतील लोकांनी एकच गर्दी केली होती. समाजातील अनेक मान्यवर या  सत्यशोधक विवाहासाठी उपस्थित होते…या विवाहा दरम्यान स्टेजवर छ. शिवाजी महाराज, छ. शाहू महाराज, राजमाता अहिल्यामाई होळकर, क्रांतिसूर्य ज्योतीराव फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई आणि विश्वरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमा स्थापित केल्या होत्या. या सत्यशोधक विवाहाची सुरुवात वधू वरांनी या महापुरुषांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करुन केली. या सत्यशोधक विवाह पद्धतीतील वर वधूने  नैतिकतेबद्दल घेतलेली शपथ, ‘येळकोट येळकोट जय मल्हारच्या गजरात तळी उचलणे तसेच मधुर आवाजामध्ये म्हटलेली सत्यशोधक मंगलाष्टके तसेच वधू-वरांना लग्नाचे विधीवत प्रमाणपत्र महाराष्ट्र शासन पत्रकार शिवश्री प्रवीण बाबाजी कोळआपटे, श्री.बबन कोकरे व दयानंद झोरे यांच्याहस्ते देण्यात आले…या सर्व बाबी पंचक्रोशीतील लोकांना विशेष आवडल्या…त्यामुळे सद्या या सत्यशोधक विवाहाची आणि सत्यशोधक विधिंची चर्चा सापुचेतळे, पावस, रत्नागिरी परिसरात आहे…दरम्यान लग्नानंतर सत्यनारायण पूजा ऐवजी बळीराजा पूजन झाले … त्याचे पौराहित्य माजी पोलीस अधिकारी मारुती उर्फ काका जोशी यांनी केले… त्यांच्यासोबत गणपत भायजे ,शंकर लाड, अर्जुन बावडेकर आदी उपस्थित होते…प्रबोधनकार काका जोशी हे रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील साखरपा गावचे रहिवाशी आहेत… ते तिल्लोरी-कुणबी समाजातील असून त्यांनी कोकणासह महाराष्ट्रात अनेक धार्मिकविधी सत्यशोधक आणि शिवधर्म पद्धतीने केले आहेत… लग्न,बळीपूजन,जिजाऊ पूजन, घरभरणी,फोटोपूजनाने उत्तरकार्य अशा विधींचा यात समावेश  आहे… कोकणातील जनता काका जोशी यांना प्रबोधनकार काका जोशी म्हणून ओळखते…