रायगड शिवसत्ता टाइम्स (वार्ताहर):-
प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर महायुती सरकारमध्ये मंत्र्यांना शपथविधी झाल्यानंतर खातेवाटप करण्यात आले…मात्र आता खातेवाटप झाल्यानंतर मंत्र्यांना दालने देण्यात आली असली तरी अजूनही तब्बल १८ मंत्र्यांनी पदभार स्वीकारलेला नाही…त्यामुळे हे मंत्री नव्या वर्षातच पदभार स्वीकारतील अशी शक्यता वर्तवली जात आहे…देशाचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या निधनाने सात दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे…त्यामुळे आजच्या दिवसात पदभार स्वीकारण्याची शक्यता कमी आहे…मात्र त्यापूर्वी या मंत्र्यांनी पदभार स्वीकारला नाही ही विशेष बाब आहे…पदभार न स्वीकारलेले दत्ता भरणे हे कुटुंबियांसमवेत परदेशात गेले आहेत…
आशिष शेलार,अतुलसावे,नरहरीझिरवाळ,भरतगोगावले,गुलाबरावपाटील,दादाभुसे,जयकुमार रावल,माणिकराव कोकाटे,मकरंद पाटील,योगेश कदम,पंकज भोयर,बाबासाहेब पाटील,दत्तात्रय भरणे,प्रकाश आबिटकर,माधुरी मिसाळ,आशिष जयस्वाल,मेघना बोर्डीकर या महत्वाच्या बड्या नेत्यांनी अद्यापही पदभार स्वीकारलेला नाही…
दुसरीकडे महाराष्ट्रात महायुतीचे सरकार आल्यापासून महायुतीत गोंधळ सुरु असल्याचे चित्र आहे…निवडणुकीच्या निकालानंतर मुख्यमंत्री पदाबाबत बरेच दिवस सस्पेन्स ठेवण्यात आला होता…यानंतर एकनाथ शिंदे नाराज असल्याचे वृत्त समोर आले होते…त्यानंतर आता मंत्रिमंडळ विस्तारानंतर मंत्र्याच्या खात्याची विभागणी झाली असताना आता पालकमंत्री पदावरून महायुतीच्या तिन्ही पक्षांमध्ये वाद सुरु आहे…महाराष्ट्राच्या निवडणुकीत भाजप,शिवसेना शिंदे गट आणि अजित पवार गट राष्ट्रवादी या पक्षांनी एकत्रित येत विधानसभा निवडणुकीत मोठे यश मिळवले होते…या घवघवीत यशानंतरही मंत्रिमंडळ विस्तारासाठी १६ दिवस लागले…दरम्यान आता शिवसेना शिंदे गट व राष्ट्रवादी अजित पवार गटामध्ये नाराजी असल्याचे दिसून येते…आता हे पार्कर्ण शांत झाले असून पालकमंत्री पदावरून तिन्ही पक्षात मोठे वाद सुरु आहेत…पालकमंत्री पदासाठी कोकणातील सिंधुदुर्ग,रत्नागिरी,रायगड तर मराठवाड्यात संभाजीनगर,बीड,उत्तर महाराष्ट्रात नाशिक,ठाणे,नवी मुंबई,कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये वाद सुरु असल्याचे चित्र आहे…
महाराष्ट्रातील रायगडमध्ये पालकमंत्र्यांवरून राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्यात संघर्ष सुरू आहे, तर गडचिरोली जिल्ह्यात भाजप आणि शिवसेना यांच्यात वाद आहे. संभाजीनगरमध्येही भाजप आणि शिवसेना यांच्यात संघर्ष आहे. बीडमध्ये भाऊ-बहीण पंकजा आणि धनंजय मुंडे मंत्री झाले आहेत, तर भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पालकमंत्रीपदासाठी रस्सीखेच सुरू आहे. राज्यातील जनतेने बहुमताचे सरकार दिले असले तरी सरकार नाराज नेत्यांना शांत करण्याचा प्रयत्न करत आहे…