रायगड शिवसत्ता टाइम्स (अमुलकुमार जैन):-
गेल्या महिन्याभरात नीलकमळ या प्रवाशी बोटीला नौसेना बोटीने भर समुद्रात धड्क दिल्याने अपघात होवून तेरा जणाचा मृत्यू झाला होता.तर मढ येथे मच्छिमारी बोटीचा अपघात झाला होता. तर आज पहाटे रायगड जिल्ह्यातील अलिबाग पासून हाकेच्या अंतरावर असणाऱ्या आक्षी साखर येथील ज्ञानेश्वर पंढरी बामजी यांच्या मालकीची वीरकन्या नावाची मच्छिमारी बोट बुडून सुमारे बारा लाखाचे नुकसान झाले आहे. सुदैवाने यामध्ये कोणत्याही प्रकारची जिविती हानी झालेली नाही.
रायगड जिल्ह्यातील अलिबाग साखरजवळ 15 खलाशी असलेली मच्छीमार बोट बुडाली आहे. सुदैवाने सगळे खलाशी वाचले आहेत. बोटीत अचानक पाणी भरल्याने ही बोट हळूहळू बुडू लागल्यानंतर सर्व खलाशांनी पाण्यात उड्या मारल्या. त्यामुळे ते वाचले. मासेमारीसाठी ही बोट समुद्रात गेली होती. बोटीमध्ये अचानक बिघाड झाल्याने गळती लागली आणि बोट बुडू लागली. या दुर्घटनेचे साक्षीदार असलेले जनार्दन नाखवा यांनी ही माहिती दिली. बुडालेल्या बोटीला दुसऱ्या बोटीने समुद्र किनाऱ्यावर खेचत साखर किनाऱ्यावर आणण्यात आले. बोटीमधील सर्व सामान खराब झाले असून बोट मालकाचे आणि खलाशांचे मिळून अंदाजे 12 लाखांचे नुकसान झाले आहे, अशी माहिती नाखवा यांनी दिली. उशिरापर्यंत बोटीतील पाणी पंपाने काढण्याचे काम सुरू होते. गेल्या महिन्यात गेटवे ऑफ इंडियाहून घारापुरीला जाणारी प्रवासी बोट नौदलाच्या स्पीड बोटीच्या धडकेने फुटून 15 प्रवाशांचा मृत्यू झाला होता…
आज पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास सदर मासेमारी बोट अलिबाग समुद्रकिनाकडे आली होती. तथापि ओहोटी असल्याने बोट अलिबाग जवळील कुलाबा किल्ला येथील दीपस्तंभाजवळ नांगरून ठेवण्यात आली होती. दरम्यान बोटीचा डिझेल पाईप तुटल्याने बोटीत पाणी भरू लागले व ती बुडाली. दरम्यान बाजूला उभा असलेल्या बोटींवरील खलाशांना हे समजल्याने ते तातडीने मदतीस धावले व बोटीवरील १५ खलाशांना बाहेर काढले. बोट बुडाल्याने केलेली मासेमारी पाण्यातून वाहून गेली. त्यामुळे सुमारे बारा लाखाचे नुकसान झाल्याचे सांगण्यात आले. काही कालावधीनंतर इतर बोटीनी बुडणारी बोट पाण्यातून काढून किनाऱ्यावर आणली आहे.