पेण शिवसत्ता टाइम्स(वार्ताहर):-
पेण शहराला लागून असणाऱ्या भोगावती या महत्त्वाच्या नदीवरील सुरु असणाऱ्या दोन पदरी पुलाचे काम युद्धपातळीवर सुरू असुन या पुलाचे काम येत्या मार्च अखेरपर्यंत पुर्ण करण्याचा मानस सार्वजानिक बांधकाम पेण विभागाचे कार्यकारी अभियंता डी.एम.पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला…या पुलाच्या बांधकामाची पाहणी करताना ते पत्रकारांशी बोलत होते…
पेण शहराला लागून असणाऱ्या आणि पेण शहर व तरणखोप गाव एकमेकांना जोडणाऱ्या भुंड्या पुलाचे काम खूप जुने आसल्याने या पुलाची कोणत्याही क्षणी पडझड होण्याची शक्यता असल्याने याच पुलाच्या बाजूने आता दोन पदरी सुसज्ज अशा पुलाची उभरणी करण्यात येत आहे… राज्याचे तत्कालीन सार्वजनिक बांधकाममंत्री रविंद्र चव्हाण हे नदीला लागुन असलेल्या विसर्जन घाटाचे उद्घाटन करण्यासाठी आले असता या पुलाची केवळ उभारणी नको तर पुलासोबतच बंधारा बांधून पाणी अडवा पाणी जिरवा ही संकल्पना राबवा असे सांगितल्यानंतर त्यांच्या संकल्पनेनुसार आणि विद्यमान आमदार रविंद्र पाटील यांच्या पाठपुराव्याने रामेश्वर कन्स्ट्रक्शनच्या माध्यमातून या कामाला गती देण्यात आली आहे…
या पाण्यामधे बोटिंग सारखी एखादा पर्यटनाला चालना देणारा व्यवसाय सुरु होऊ शकतो असे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी डी एम पाटील यांनी सांगितले. त्याच प्रमाणे या दोन पदरी पुलासाठी सव्वा चार कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला असुन पुलाची लांबी ही शंभर मीटर तर बंधाऱ्याची लांबी ही ऐंशी मीटर आहे… त्याचप्रमाणे पुलाची उंची ही जुन्या पुलापेक्षा एक मीटर जास्त असल्याने पावसाळ्यामध्ये भोगावती नदीच्या या सुसज्ज पुलावरून पाणी जाण्याचा धोका टळणार आहे… या पुलाचे बांधकाम पावसाळ्यापूर्वी म्हणजेच मार्च अखेर पर्यंत पुर्ण करण्याचा मानस आमचा आहे.अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभाग पेणचे अधिकारी डी एम पाटील यांनी पत्रकारांना दिली.