भारताच्या लेकीची अंडर-१९ एकदिवसीय टी-२०…आयसीसी वूमेंस वनडे क्रिकेट चॅम्पियन्स ट्रॉफी फायनलमध्ये झेप…

0
37

मुंबई शिवसत्ता टाइम्स (देवेंद्र मोरे) :-

भारताच्या अंडर-१९ महिला संघाने मलेशियामध्ये खेळल्या जात असलेल्या १९ वर्षांखालील एकदिवसीय टी-२० चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनल अंतिम फेरीत इंग्लंड संघाला पाणी पाजत रूबाबदार धडक मारली आहे…उपांत्य फेरीच्या सामन्यात भारताने इंग्लंडवर ९ विकेट्सने मोठा विजय मिळवला. भारताच्या फिरकीपटू गोलंदाजांनी भारताच्या विजयाचा पाया रचला तर संघाच्या सलामी वीरांनी विजयावर शिक्कामोर्तब केले.भारताच्या संघाने मलेशियातील या आयसीसी अंडर-१९ वूमेंस वनडे क्रिकेट चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत अद्याप एकही सामना गमावलेला नाही तर उलटपक्षी इंग्लंडने भारता विरूद्ध एकही सामना जिंकलेला नाही.नाणेफेक जिंकून इंग्लंड संघाने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

इंग्लंडच्या सलामीवीरांनी हा निर्णय अगदी योग्य ठरवला. सुरुवातीला त्यांनी चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडला. पण भारताची फिरकीपटू पारूनिका हिने गोलंदाजीला येताच भारताला पहिला ब्रेक मिळवून दिला. पारूनिका हिने लागोपाठ दोन विकेट्स काढून इंग्लंडला चांगलाच धक्का दिला.घट फेरीत अजय राहिल्यानंतर भारताने उपांत्य फेरीत इंग्लिश फलंदाजाना शरणागती पत्करण्यास भाग पाडले. भारतीय गोलंदाजांनी उपांत्य फेरीच्या सामन्यात कहर केला. भारतीय गोलंदाजीपुढे इंग्लंडचा संघ २० षटकात केवळ ११३ धावाच करू शकला.भारतीय संघाने ५ षटके शिल्लक ठेवत ११७ करून विजय मिळवला.भारतीय गोलंदाज या सामन्यात किती वरचढ होते याचा अंदाज विकेट्स वरून येतो आठ पैकी सहा फलंदाजांना भारताच्या गोलंदाजांनी चक्क क्लीन बोल्ड केले आहे. तर दोन फलंदाज झेलबाद झाले.यानंतर पारिन आणि नोग्रोव्ह चांगली भागीदारी रचत असतांनाच आरुषी शुक्लाने‌ पारिनला क्लीन बोल्ड करीत भारताला महत्वपूर्ण विकेट मिळवून दिली. त्यानंतर इंग्लंडघी कर्णधारही बाद झाली आणि इंग्लंडचा डाव यानंतर पत्त्यांसारखा कोसळला. वैष्णवी शर्माने सोळाव्या षटकात ३ विकेट्स घेत इंग्लंडला बॅकफूटवर टाकले. यक्ष त्रिशानेही एक विकेट घेतली.इंग्लंडने दिलेल्या ११४ धावांचा पाठलाग करताना नेहमी प्रमाणेच भारताच्या सलामी जोडीने चांगली सुरुवात करून दिली. मागील सामन्यातील शतकवीर गोंगाडी त्रिवार बाद झाल्याने भारताला धक्का बसला, पण तिने २९ चेंडूत ५ चौकारांसह ३५ धावांची शानदार खेळी केली. तर यानंतर जी. कमलिनी हिने अर्ध शतक झळकावत संघाचा विजय निश्चित केला.