नेताजी पालकर यांच्या जन्म गावी उंबरखिंड रण संग्राम ३६४ विजयी दिवस साजरा… 

0
79

चौक  शिवसत्ता टाइम्स (अर्जुन कदम) :-

२ फेब्रुवारी १६६१ रोजी उंबरखिंड येथे झालेल्या लढाईचा ३६४ वा विजय दिवस चौक येथील नेताजी पालकर यांच्या जन्मस्थळापासून ते तुपगाव येथील त्यांच्या स्मारकापर्यंत विजयी मशाल रॅली काढून साजरा करण्यात आला….
२ फेब्रुवारी इ.स.१६६१ ला कारतलब खानाच्या नेतृत्वाखाली मुघल सैन्य पुण्याहून निघून लोहगडच्या घाटमाथ्यावरून उंबरखिंडीच्या दिशेस उतरू लागले… नळीसारख्या बारिक वाटेने मुघल सैन्य सह्याद्री डोंगर उतरत होते…. घाट उतरून मुघल सैन्य पुढे उंबरखिंडीत आले… उंबरखिंडीच्या घनदाट अरण्यात छत्रपती शिवाजी राजांच्या सैन्याने मुघलांवर बाणांच्या वर्षावाने व तोफांच्या गोळ्यांनी हल्ला सुरू केला…. मुघल सैन्याचे मराठा सैन्याकडून प्रचंड हाल होत असताना रायबाघण यांच्या सल्लावरून कारतलब खानाने तह करण्यासाठी शिवाजी राजांकडे दूत पाठवला… कारतलब खानाचा दूत शिवाजीराजांकडे आला व कारतलब खान पूर्ण शरणागती पत्करतो आहे व ह्या प्रदेशातून बाहेर पडण्यासाठी परवानगी मागत आहे… हा संदेश दुकाने शिवाजी राजांना दिला… शिवाजी राजांनी विनंती मान्य करून , कारतलब खानाला मुघल सैन्यासह निघून जाण्यास सांगितले…. हा संदेश दूताने कारतलब खानाकडे पोहोचवला… तेव्हा कारतलब खान, मित्रसेन व इतर मुघल सरदारांनी शिवाजी राजांना खंडणी पाठवली… उंबरखिंडीच्या वेगवेगळ्या भागात लढत असलेल्या मराठा सैन्याला युद्धबंदीचा संदेश देण्यात आला व मुघल सैन्याला आल्या वाटेने परत पाठवण्यात आले….
युद्धात हरलेल्या मुघलांनी परत हल्ला केला तर त्यांचा बंदोबस्त करता यावा म्हणून शिवाजी राजांनी सेनापती नेतोजी पालकर यांना उंबरखिंडच्या परिसरात म्हणजेच उत्तर कोकणात ठेवले व शिवाजी राजे स्वतः दाभोळ, शृंगारपुरच्या दिशेस दक्षिण कोकणच्या मोहिमेवर गेले… हा जाज्वल्य इतिहास आजही ताजा आहे… २ फेब्रुवारी २०२५ रोजी नेताजी पालकर यांच्या जन्म गावी चौक येथे ३६४ वा विजय दिवस हा विजयदिन सोहळा नेताजी पालकर यांच्या जन्म स्थळ येथे त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून व विजयी मशाल प्रज्वलित करून केला….
छत्रपती शिवाजी महाराजांनी समरभूमी उंबरखिंड येथे कारलतलब खानाच्या असंख्य मुघल सैनिकांवर महाराजांनी मूठभर मावळे घेऊन मोठा विजय मिळवला होता, त्यांचे स्मरण आणि आठवणींना उजाळा देण्यासाठी पंचक्रोशीतील ग्रामस्थ, चौक ग्रामस्थ ग्रुप ग्रामपंचायत चौक, सिनिअर ग्रुप चौक, शाळा, सामाजिक संस्था  यांच्या वतीने हा उत्सव विजयदिन म्हणून साजरा करण्यात आला… खालापूर वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन पवार, सरपंच रितू ठोंबरे, सरपंच रविंद्र कुंभार, सिनियर ग्रुप अध्यक्ष संजय कोंडीलकर, सुरेश घाग, भारतीय जनता पक्षाचे उपाध्यक्ष सुधीर ठोंबरे, जिल्हा परिषद सदस्य मोतीराम ठोंबरे, माजी सभापती श्याम साळवी, अॕड. मिलिंद सुरावकर, उपसरपंच सुभाष पवार, ग्राम पंचायत अधिकारी एस.पी.जाधव, मंडळ अधिकारी माणिक सानप, चौक चे सपोनि. मनिष मोरे, शोभाताई देशमुख, शिवव्याख्याते प्रशांत देशमुख, मुख्याध्यापक कांबळे, पूजा हातमोडे, स्वप्नील सोनटक्के, अजिंक्य चौधरी, नयना झिंगे, वृषाली पोळेकर, कविता कोंडीलकर यांच्या सह ग्रामस्थ नागरीक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यार्थी यांनी विजयी मशाल रॅली मधुंन छत्रपती शिवाजी महाराज यांच्या लढाई, आईचा गोंधळ, जागरण, ऐतिहासिक गीते, तलवारबाजी यांची प्रात्यक्षिक दाखविले… संपुर्ण चौक बाजारपेठ मधून रॅली निघून तुपगाव येथिल स्मारकाजवळ सरपंच रितू ठोंबरे व तुपगाव सरपंच रविंद्र कुंभार सर्व ग्रामपंचायत सदस्य, अधिकारी, ग्रामपंचायत कर्मचारी यांनी रॅलीचे स्वागत केले…