उरण शिवसत्ता टाइम्स (प्रविण पाटील):-
आराध्या विनोद पुरो हिने विविध बुद्धिबळ स्पर्धेमध्ये जसे विविध जिल्ह्यांमध्ये मुंबई,उपनगरांसह जसे ठाणे, रायगड, कल्याण या जिल्ह्यांमध्ये गेल्या दोन वर्षांत झालेल्या विविध जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धांमध्ये आराध्या पुरो ने वयाच्या ९ व्या वर्षी इतिहास रचला… आराध्या ही उरण एज्युकेशन सोसायटी या शैक्षणिक संस्थेमध्ये इयत्ता ३ री मध्ये शिकत आहे… तिला शालेय अभ्यासा व्यतिरीक्त बुद्धीबळ हा खेळ गेली दोन वर्षांपासून ती सातत्यपूर्ण अतिशय एकाग्रतेने खेळत आहे… आराध्या ही गेल्या दोन वर्षांत १०० स्पर्धांमध्ये सहभागी झाली,आणि प्रत्येक स्पर्धेत ती यशस्वीही झाली… रविवार दि. २ फेब्रुवारी रोजी ठाणे जिल्हा स्तरीय स्पर्धा कोरम माॅल येथे सहभागी झाली आणि मग नेहमीप्रमाणे तिने शंभराव्या स्पर्धेत देखील प्रथम क्रमांक पटकावला आहे…या निमित्ताने तिने तिच्या बक्षिसांची शंभरी दोन वर्षांत पूर्ण केली…
आराध्याचा या ऐतिहासिक यशाबद्दल तिचे संपूर्ण उरण तालुक्यातून नव्हे तर नवी-मुंबई, रायगड जिल्ह्यातील जनतेकडून कौतुक केले जात आहे…आज आराध्याच्या शंभरावी ट्राॅफी छत्रपती शिवरायांच्या चरणावर ठेवण्याची ईच्छा असल्यामुळे विमला तलाव येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्टॅच्यूच्या ठिकाणी आराध्याचा सत्कार करण्यासाठी उत्स्फुर्तपणे चेस रेफ्री संदीप पाटील, उरण सामाजिक संस्थेचे सरचिटणीस संतोष पवार, माजी नगराध्यक्ष गणेश शिंदे, नगरसेवक अतूल ठाकूर, पत्रकार संघाचे अध्यक्ष घनःश्याम कडू, उपाध्यक्ष विरेश मोडखरकर, उद्योग पती सुरेश ठाकूर, प्रा. निरंतर सावंत, सामाजिक कार्यकर्त्या लता पानसरे, नगरसेवक समिर मुकरी उपस्थित होते…
या प्रसंगी कामगार नेते संतोष पवार आणि चेस रेफ्री संदीप पाटील यांनी मनोगत व्यक्त करताना आराध्याला भावी काळात तीची उत्तरोत्तर प्रगती होण्यासाठी शुभेच्छा देत असताना आता सर्वांच्या अपेक्षा आराध्याकडून वाढल्या आहेत… तसेच सर्वात महत्त्वाचे म्हणजे लहान पणीच तिची आई रश्मी आणि वडील विनोद पुरो यांनी आपल्या मुलीची आवड लक्षात घेऊन तिला पुर्णपणे सहकार्य करण्याचा निर्णय घेतल्याबद्दल तसेच तिच्या यशामध्ये तिची प्रचंड मेहनत जशी आहे,तसेच तिची आई रश्मी, वडिल विनोद पुरो आणि मावशी प्रिया यांची देखील प्रचंड मेहनत आहे… तसेच तिला मार्गदर्शन करणार्या प्रशिक्षक चेस रेफ्री संदीप पाटील यांची देखील तेवढीच मेहनत आहे… या बद्दल सर्वांचे मनापासून अभिनंदन करुन सर्वांनी आराध्याला शाल परिधान करून पुष्पगुच्छ देऊन सन्मानित केले… या प्रसंगी संजय पवार, अमित नार्वेकर, हितेश पटेल, मृण्मयी पुरो, रूपाली पवार हर्षवर्धन पवार,चेतन,रवी सोलंकी,हेमंत अधिकारी, महेश वर्तक, विलास शिंदे हे उपस्थित होते…