रायगड शिवसत्ता टाइम्स (अमुलकुमार जैन):-
महाड एमआयडिसीमध्ये पाच बकऱ्या मेल्या तर चार बकऱ्या गंभीर असल्याची घटना समोर आली आहे… महाड एमआयडिसीतील टेमघर नाल्याचे पाणी प्यायल्याने बकऱ्यांची प्रकृती बिघडल्याचे शेळी पालकाचे म्हणणे आहे… या घटनेमुळे महाड एमआयडिसीतील जीव घेण्या प्रदुषणाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे…पाच बकऱ्यांचा जागीच मृत्यू झाला तर चार बकऱ्यांची प्रकृती अस्वस्थ असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत…या घटनेमुळे शेळी पालक अर्जुन जाधव आणि त्याच्या कुटुंबावर दुःखाच्या डोंगराबरोबरच आर्थिक संकट कोसळले आहे…प्रदूषण करणाऱ्या कारखान्यावर अगर त्यांना पाठीशी घालणाऱ्या प्रदूषण नियंत्रण मंडळाविरोधात गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली जात आहे…