मुलांचे संस्कार व शिक्षणाची प्रगती पालकांचे प्रथम जबादारी : राजाभाऊ ठाकूर

0
46

माणगाव शिवसत्ता टाइम्स (वार्ताहर ):-

लहान मुलांचे संस्कार व शिक्षणाची प्रगती ही आई वडिलांची महत्वाची जबाबदारी आहे…आणि नंतर शाळा असे महत्वाचे प्रतिपादन शिक्षण महर्षी, सामाजिक कार्यात अग्रेसर असलेले तथा कोकणातील काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते राजाभाऊ ठाकूर यांनी लिटल के.जी.शाळेच्या २३ व्या वार्षिक स्नेह संमेलन तसेच बक्षीस वितरण समारंभा प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून भाषण करताना व्यक्त केले. यावेळी त्यांच्यासोबत रायगड भूषण मानकरी तथा याच शाळेची माजी पालक दिलीप उभारे विशेष पाहुणे म्हणून उपस्थित होते.कार्यक्रमाची सुरुवात आलेल्या सर्व पाहुण्यांना मानाचे बिल्ले देऊन करण्यात आली…यानंतर मान्यवरांचे शब्द सुमनाने स्वागत करण्यात आले…

दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाचे उदघाटन करून मुख्य अतिथी राजाभाऊ ठाकूर यांनी श्रीफळ वाढवून त्यातील नारळ पाणी उपस्थित सर्व बाल विद्यार्थी यांना पाजून उपस्थित मान्यवर, पालक, प्रेक्षक वर्ग तसेच शाळेचे कर्मचारी यांना देऊन एक सुखद अनुभव आला असे राजाभाऊ यांनी म्हटले व कार्यक्रमास खऱ्या अर्थाने रंगतदार स्थिती आणण्यात हातभर लावले…पुढे मुख्याध्यापक पाटील सर यांनी राजाभाऊ ठाकूर व दिलीप उभारे सर यांना शाल-श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन तसेच इतर मान्यवरांचे देखील पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले…

दरम्यान मुख्यध्यापक यांनी प्रस्तावना केल्यानंतर मान्यवरांच्याहस्ते बाल विध्यार्थी यांना शैक्षणिक वर्ष 2024/25 वर्षाच्या कालावधीत संपादन केलेल्या कला,कौशल्य, शिक्षण व इतर क्रीडांमध्ये प्राविण्य मिळविलेल्या सुयषाकरीता प्रमाण पत्र, बक्षीस व खाऊ वाटप अमूल्य हस्ते करण्यात आले. तसेच इतर विध्यार्यांनी राबविलेल्या उपक्रमात भाग घेतल्याबद्दल त्यांना देखील प्रोत्साहनपर बक्षीसे देण्यात आली…दरम्यानाचा आयोजित पालक-बालक, शाळा सहलीत करमणूक उपक्रमात बक्षीस पटकाविलेल्या विजेते विद्यार्थी यांचे आई वडील (पालक) यांनाही मान्यवरांच्या हस्ते बक्षीसे तसेच प्रमाण पत्रे देऊन शानदार गौरव करण्यात आला.

दरम्यान राजा भाऊ ठाकूर यांनी आपल्या भाषणात आजचा हा शिक्षण सोहळा (वार्षिक स्नेह संमेलन) विद्यार्थ्यांकरीता आनंदाचा क्षण असल्याचे सांगितले. माजी आमदार स्व. मधुकर ठाकूर यांनी शैक्षणिक क्षेत्रात भरीव कामगिरी केलेली आहे. या बाबत प्रकाश टाकतांना सांगितले की अलिबाग सातव येथील एका शिक्षण संस्थेच्या शाळेचा दर्जा व ग्रामीण भागातील विध्यार्थ्यांकरीता उच्च शिक्षण मिळावे म्हणून दहावी बारावीच्या पुढे जाऊन तिन्ही क्षेत्र जसे आर्टस्, कॉमर्स व सायन्स डिग्री-महाविद्यालय सुरु केले आणि अनेक विध्यार्थ्यांना आपल्या भावी आयुष्यात उच्च पदावर जाण्यासाठी आपला योगदान दिले आणि मी इंजिनिअर झालो तर याच शिक्षणाचे महत्वाचे धागे निदर्शनास आणून दिले की.. अन्न, वस्त्र, निवारा बरोबर आता शिक्षण व आरोग्य देखील महत्वाचे मुलभूत अंग बनल्याचे सांगितले. शिक्षणामुळे आरोग्या बाबत जागृती तसेच विद्यार्थ्यांच्या कला-कौशल्य तसेच सुप्त गुणधर्मांना वाव मिळण्यास मदत झाल्याने अश्या कार्यक्रमात विध्यार्थी सादर करीत असल्याने आपल्याला पाहायला मिळत आहे. या छोट्या शाळांची उत्तरोत्तर वाढ होण्यासाठी आपला विचार मांडाताना सांगितले की जी काही मदत करणे शक्य होईल ते मी करेन अशी पुष्टी जोडून शुभेच्छा दिल्या आणि कार्यक्रमास बोलाविल्याबद्दल आभार व्यक्त केले तसेच विद्यार्थ्यांच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देऊन मुलांचे संस्कार व शिक्षणाची प्रगती आई-वडिलांच्या हातात असते नंतर शाळा असे अत्यंत महत्वपूर्ण विधान करून राजा भाऊ ठाकूर यांनी ही खास बाब पालकांच्या निदर्शनास आणून देऊन आपले भाषण आटोपते घेतले.

यानंतर दिलीप उभारे सर यांचेहि भाषण झाले. अंती शिक्षण महर्षी तथा कोंकणचे दिग्गज राजकीय नेते सन्माननीय राजेंद्र मधुकर ठाकूर उर्फ राजा भाऊ ठाकूर यांनी सर्व विध्यार्थ्यांना खास भेट वस्तू व खाऊ वाटप करताच विध्यार्थी यांचा आनंद द्विगुणित झाल्याचे पाहायला मिळाले.कार्यक्रमाचे अंती आभार प्रदर्शन होऊन कार्यक्रम पार पडले. दरम्यान राजा भाऊ ठाकूर यांचे बरोबर रायगड जिल्हा काँग्रेस सचिव डॉ. नरेंद्र सिंह, माणगाव ता.अध्यक्ष विलास सुर्वे, कार्यकर्ते तथा माजी पालक फारुख परकार सह इतर मान्यवर व्यासपीठावर विराजमान झालेले पाहायला मिळाले. या दरम्यान राजा भाऊ ठाकूर यांचे शिक्षण क्षेत्रातील मोठे योगदान पाहायला मिळाले.

कोंकणातील अनेक शिक्षण संस्थांना सामाजिक बांधिलकी म्हणून हातभर लावत आहेत त्याचबरोबर अनेक शिक्षण संस्थेतील महत्वाच्या पदावर देखील असल्याने राजकीय व शिक्षण क्षेत्रही त्याचे योगदान दिसत आहे.