उच्चदाब विद्युत वाहिन्या टाकण्यास शेतकऱ्याचा विरोध… युवानेते वैकुंठ पाटील यांनी घेतली प्रांताधिकाऱ्यासोबत बैठक…

0
34

पेण शिवसत्ता टाइम्स (वार्ताहर):- 

पेण तालुक्यातील खारकोलेटी येथील जमिनीमध्ये महापारेषणच्यावतीने उच्चदाब विद्युत वाहिन्या टाकण्यात येत असून या वाहिन्या शेतकऱ्यांना विश्वासात न घेता टाकण्यात येत असून या कामाला स्थानिक शेतकऱ्यांचा विरोध असून या संदर्भात आज भाजप जिल्हा उपाध्यक्ष वैकुंठ पाटील यांच्या नेतृत्वाखाली जनशक्ती संघर्ष समितीच्या वतीने प्रांताधिकारी प्रवीण पवार यांना निवेदन देण्यात आले.

यावेळी संघर्ष समितीचे अध्यक्ष प्रभाकर डाकी, उपाध्यक्ष हेमंत भोईर , सचिव मधुकर ठाकूर, चंद्रकांत ठाकूर, तुलसा भोईर, दयाराम भोईर, किशोर भोईर, चंद्रकांत भोईर, प्रकाश भोईर, किशोर ठाकूर, जनार्दन भोईर, सुरेश तांडेल, कामिनी भोय ,प्रमोद भोईर आदींसह शेतकरी वर्ग उपस्थित होते.

यावेळी बोलताना वैकुंठ पाटील यांनी सांगितले कि, कानसई ते वडखळ टाकण्यात येणाऱ्या उच्चदाब विद्युत वाहिनीच्या टॉवरचे काम चालू असून या कामाला शेतकऱ्यांनी विरोध दर्शविला असून या मुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान होणार आहे…टॉवरलाईन टाकायला विरोध नसून नदीच्या बाजूने हि लाईन टाकण्यात यावी यामुळे महापारेषण विभागाने हे काम तातडीने बंद करून प्रथम शेतकऱ्यांना विश्वासात घ्यावे. याबाबत प्रताधिकार्ऱ्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना बोलावून बैठक लावण्यात यावी अशी मागणी करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.
आमचा टॉवर लाईनला विरोध असून यामुळे शेतकऱ्यांच्या शेतीचे नुकसान होणार असून भविष्यात जमिनीचे मुल्याकंन कमी होणार आहे..असे यावेळी संघर्ष समितीचे अध्यक्ष प्रभाकर डाकी यांनी सांगितले.प्रांताधिकारी प्रवीण पवार यांनी या कामाविषयी चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांना बोलावून बैठक लावण्यात येईल असे त्यांनी सांगितले.