रायगड शिवसत्ता टाइम्स (धम्मशील सावंत):-
14 फेब्रुवारी म्हणजे व्हॅलेंटाईन डे.अस म्हणतात की प्रेमाचा मार्ग पोटातून जातो…तहानलेल्याना पाणी भुकेल्या जीवाला अन्न याच उदात्त भावनेतून पुढे आला तो रोटी डे. कुणाल रवींद्र चव्हाण व सहकाऱ्यांचा अनोखा रोटी डे आता राज्यात चर्चेत आलाय. आपण ज्या समाजात राहतो, त्या समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो” या सामाजिक बांधिलकीचा नात्यातून त्यांनी “युवा अस्मिता फाऊंडेशन” या संस्थेची स्थापना केली. या संस्थेमार्फत भुकेलेल्या जीवासाठी एक दिवस “रोटी डे” हा उपक्रम करण्याचे ठरवले. आणी मग त्यासाठी योग्य दिवस निवडण्याचे ठरले. कुणालचा कल्पक बुद्धीने १४ फेब्रुवारी हा दिवस त्यासाठी योग्य असल्याचे मत त्याने मांडले. कारण आजकालचा तरुण पिढीला एक वेगळी दिशा देणारा हा दिवस आहे. मुळात आपली संस्कृतीच नसणारा १४ फेब्रुवारी हा दिवस व्हेलेटाईन डे म्हणून आजची तरुण पिढी मोठ्या उत्साहाने साजरी करते. आधुनिकतेचा नावाखाली आजची तरुणपिढी या वेगवेगळ्या “डे” मुळे भरकटली जाऊ लागली आहे. आजचा तरुणपिढीला अशा संस्कृतीपासून परावृत्त करण्यासाठी तरुणांनी या दिवशी ‘रोटी डे’ साजरा करावा म्हणून त्याला हा दिवस योग्य वाटला. सुरुवातीस १०/१५ तरुणांना घेऊन सुरु केलेल्या या संस्थेचे जाळे आता संपूर्ण महाराष्ट्र व महाराष्ट्रा बाहेर देखील विणले गेले आहे. या वर्षी कु. कुणाल रवींद्र चव्हाण आणी त्याचा सहकार्यानी महाराष्ट्रातील १५ ते १६ जिल्ह्यात हा रोटी डे साजरा करून हजारो अनाथांचा अन्नाची सोय केली. अन्नदान हेच सर्वश्रेष्ठ दान हे समजून त्यांनी केलेलं कार्य खरच खूप कौतुकास पात्र आहे. असे संस्काराचे धडे कुठल्याच पाठ्यपुस्तकाचा धड्यात दिले जात नाहीत. ते येतात ते आईचा उदातून, तीने दिलेल्या संस्कारातून. आपल्या कार्यकर्तृत्वाने त्यांनी देखील शिक्षण क्षेत्रात अल्पावधीतच मोठ नाव केल आहे. अशा या कर्तृत्वान तरुणास मानाचा सलाम. भविष्यात कुणालच्या हातून असेच तरुणांना दिशा देणारे काम घडो असेच आशीर्वाद व शुभेच्छा त्याला मिळताना दिसत आहेत