उरण शिवसत्ता टाइम्स (प्रविण पाटील):-
उरण तालुक्यात अपघाताची मालिका सुरूच आहे…जासई दास्तान-चिर्ले रेल्वे उड्डाण पुलावर शुक्रवारी दिनांक.२१ फेब्रुवारी रोजी रात्री ९:३० वाजण्याच्या सुमारास एका अज्ञात टेम्पो चालकाने मोटरसायकलला धडक दिल्याने मोटरसायकलस्वाराचा जागीच मृत्यू झाला असून अपघातग्रस्त टेम्पो चालक फरार झाला आहे…मोहम्मद जफिर मोहम्मद समीर शहा वय वर्ष ४५ असे मृत युवकाचे नाव असून या तरुणावर अंत्यसंस्कार होतात न होतात तोच गव्हाण फाटा ते दिघोडे रस्त्यावरुन भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रान्सटार हॅडलिग ॲण्ड वेअरहौसिग कंपनीचा कंटेनर ट्रेलरने मोटारसायकलस्वाराला जांभूळपाडा बस स्थानकाजवळ चिरडून टाकल्याने झालेल्या अपघातात मोटारसायकल क्रमांक एमएच ४६ एए ४६५४ वरील मोटारसायकलस्वाराचा जागीच मृत्यू झाला आहे. सदर अपघात हा शनिवारी दिनांक.२२ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५ ते ६ वाजण्याच्या सुमारास घडल्याची माहिती समोर येत आहे.
रस्ते व वाहतूक विभागाचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी हिवाळी अधिवेशनात वाढत्या अपघाताबद्दल दिलगिरी व्यक्त केली होती. परंतु यावर प्रशासन ठोस उपाययोजना करत नसल्याने अपघाताचे सत्र हे कमी न होता वाढतच आहे. त्यात महसूल विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, सिडको तसेच संबंधित प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे तसेच आरटीओ, वाहतूक पोलीस यांचा अथिॅक साटेलोटे मुळे उरण तालुक्यात अनाधिकृत कंटेनर यार्डचे बस्तान वाढत आहे. अशा कंटेनर यार्डमध्ये कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या अवजड वाहनांची ये-जा ही रहदारीच्या रस्त्यावर वाढत आहे. त्याचा परिणाम हा अपघातातील निष्पाप तरुणांच्या मृत्यूनंतर कुटुंबाच्या सदस्यांना सहन करावा लागत आहे. सदर मृत युवक हा पनवेल तालुक्यातील वावंजे गावातील असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.
तसेच दास्तान ते जासई उड्डाण पुलावर १५ जानेवारी ते १५ फेब्रुवारीपर्यंत एक महिन्यात तिन अपघात होऊन दोन जणाना प्राण गमवावे लागले आहेत…उरणचे उड्डाण पुल मौत का कुवा बनत आहेत… उरणमधील अपघात प्रशासन, वाहतूक पोलीस,आरटीओ राजकीय पक्ष यांना सोयरसुतक नाही…या दोन्ही अपघाताची माहिती उरण पोलिसांना तसेच उरण वाहतूक शाखेच्या पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामे सुरू केले आहेत. मात्र महसूल विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, सिडको तसेच संबंधित प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे उरणचे रस्ते हे निष्पाप तरुणांच्या रक्ताने माखत असून उरणमधील रस्त्याजवळील अनाधिकृत कंटेनर यार्ड, इतर बांधकामे, भंगाराची दुकाने, बेशिस्त अवजड वाहनांच्या वाढत्या वर्दळीवर तात्काळ कारवाईचा बडगा उगारावा अशी मागणी संतप्त प्रवाशी नागरिक करीत आहेत…