हवामानातील बदलाचे फटके या विषयावर एक दिवसीय कार्यशाळा संपन्न…

0
26

माणगाव शिवसत्ता टाइम्स (नरेश पाटील) :-

यंदाच्या उन्हाळी हंगाम विषयी सध्या एक वेगळाच वातावरणाचा अनुभव मिळू लागल्याचे चित्र पहायला मिळत आहे…. गर्मी ऋतू हा फेब्रुवारी ते मे महिन्यापर्यंत असतो… मात्र आता कधीही पाऊस, उन, थंडी याचे तारतम्य राहिले नाही… यावेळी तर रात्रीच्या वेळी वातावरण वेगळेच असते…. गेली चार पाच दिवस दिवसभर उन्हाचे चटके, तर रात्री दहा नंतर पारा खाली उतरतो तर सकाळी ०९ पर्यंत गुलाबी थंडी जाणवू लागली आहे…

हवामानातील बदलाचे फटके या विषयावर एक दिवसीय कार्यशाळा नुकताच संपन्न झाली… यावेळी आपल्या राज्याला भविष्य काळात होणाऱ्या परिणामाबाबत चिंता व्यक्त करण्यात आली… २०२५ च्या फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यातच तीव्र उष्णता जाणवू लागली आहे… मात्र मार्च महिना सुरु झाल्यावर अचानक हवामानामध्ये बदल झाला आहे… गुलाबी थंडी हा अनुभव सर्वांना आनंद दायक आणि तीव्र उष्णता हा मोठा त्रासदायक असताना आरोग्यवर याचा वाईट परिणाम होत आहे… शुक्रवार दि. ०७ मार्च रोजी पहाटे ते सकाळ पर्यंत या उन्हाळ्याच्या हंगामात पारा झपाट्याने उतरला, मात्र दहा नंतर तीव्र उष्णता वाढल्याने त्याचे रौद्र रूप दिवसा १२ नंतर सायंकाळी चार पर्यंत ३६ ते ३८ सेलसियस राहत असतो… मात्र रात्री थेट पारा उतरून २० ते २३ डिग्री वातावरण असते… येथिल एका तरुण युवकाने सांगितले की, रात्री गारवा जाणवत असतो, मात्र दिवसाच्या भयंकर ऊन्हामुळे सततच्या बदलत्या वातावरणामुळे आरोग्यावर परिणाम होणार असल्याचे मत व्यक्त केले…