इंदरदेव धनगरवाडीमध्ये नुकसान झालेल्या घरांची पुनर्बांधणी करून सुविधा देणे…मदार गोपीचंद पडळकर यांची सरकारकडे मागणी….

0
34

रोहा शिवसत्ता टाइम्स (अक्षय जाधव ) :-

रोहा तालुक्यातील इंदरदेव धनगरवाडीत ६ मार्च रोजी लागलेल्या वनव्यामुळे तब्बल ४४ घरे ,१५ गोठे,एक शाळा व वनसंपदाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते…ही भयान परिस्थितीची माहिती संपूर्ण राज्यात बातमी पसरली असल्याने सोमवारी दि. (१० ) रोजी धनगर समाजाचे नेते आमदार गोपीचंद पडळकर यांनी तीन किलोमीटर चालत जाऊन स्वत इंदरदेव धनगरवाडी ग्रामस्थांची भेट घेऊन प्रत्यक्ष पाहणी करून परिस्थितीचा आढावा घेतला . यावेळी पडलकर यांनी सांगितले की, ४८ घरापैकी जवळपास ४४ ते ४५ घरे आगीमुळे जाळाली असल्याने धनगर बांधवांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे… त्यामुळे सरकारने नुकसान झालेल्या घरांची पुनर्बांधणी करावी परंतु त्यांना पाणी, रस्ता अशा सुविधा उपलब्ध करून द्याव्या अशी मागणी आमदार गोपीचंद पडळकर यांनी सरकारकडे केली आहे…तर यावेळी धनगर समाजाच्यावतीने विविध मागण्यांचे निवेदन पडळकर यांना देण्यात आले.

दरम्यान ६ मार्चला सायंकाळी चार वाजता साडेचार हेक्टर हा वनवा पेटल्याने याच वनव्याने रौद्ररूप धारण केल्याने येथील ४५ घरे जळून खाक झालेली असल्याची माहिती आमच्या धनगर समाजातील तरुणांनी मला माहिती दिली असता आज मी प्रत्यक्ष येऊन पहाणी केली…इथे जनावरे ,गोठे व राहती घरे आहेत . साधी पिण्याची पाण्याची सोय नाही . प्रामुख्याने आदिवासी वाड्या ,धनगर समाज, व राज्यातील बंजाऱ्याचे तांडे समाजासाठी यांना जोडण्यासाठी नुसत्या रस्ता योजना उपयुक्त ठरणार नाहीत तर वेगळा बजेट देण्याची गरज होती…धनगर समाजासाठी यशवंतराव होळकर रस्ते रोड योजना , आदिवासी साठी बिरसा मुडा योजना , बंजारा समाजातील संत सेवालाल योजना आहे.रायगड व कोकणमध्ये कुठे ना कुठे धनगर समाजातील वाड्याच आहेत त्यांच्या विकासासाठी एक दोन हजार कोटी रुपये बजेटच्या माध्यमातून मिळावे म्हणजे विषय मिटुन जाईल असे पडळकर म्हणाले .

आजच राज्य सरकारला येथील परिस्थिती सांगणार आहे.राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व एकनाथ शिंदे हे संवेदनशील असल्याने प्रशासनाला योग्य त्या सूचना देतील व या समाजाला न्याय मिळेल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली…तसेच या रायगड जिल्हा सर्व पक्षीय यांनी इंदरदेव धनगरवाडी येथील समाजाच्या पाठीशी राहिले पाहिजे असे आवाहन पडळकर यांनी केले आहे…
यावेळी भाजपा तालुका अध्यक्ष अमित घाग, भाजपा युवा मोर्चा जिल्हा चिटणीस नरेश कोकरे,धनगर नेते रामभाऊ केंडे, शिंगाडे अध्यक्ष , देशमुख व आखाडे यासह ग्रामस्थ उपस्थित होते .