माणगाव शिवसत्ता टाइम्स (दीपक दपके):-
होळी सणासाठी कोकणात निघालेल्या कोकणकरांना मुंबई-गोवा महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे….इंदापूर ते माणगाव दरम्यान ४ ते ५ किलोमीटर लांब वाहनांच्या रांगा लागल्या आहेत.महामार्गावरील वाहतूक कोंडीमुळे प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. महामार्गाचे चौपदरीकरण अद्याप पूर्ण झालेले नाही, त्यामुळे वाहतूक कोंडी अधिक होत आहे. वाहतूक व्यवस्थापनासाठी पोलीस यंत्रणा ड्रोनचा वापर करत आहे.माणगाव बाजारपेठमध्ये वाहतुकीची कोंडी दिसून येते जवळजवळ तीन तास प्रवासी उन्हामध्ये अडकून पडले आहेत सलग दोन-तीन दिवसाची सुट्टी आणि होळीचा सण साजरा करण्यासाठी कोकणवासी मोठ्या प्रमाणात कोकणात निघाले आहेत गणेश उत्सव प्रमाणेच होळी उत्सव साठी कोकणात निघालेल्या कोकणवासीयांना महामार्गाचे काम अपूर्ण असल्याने हाल होत आहे…महामार्ग पोलीस ठीक ठिकाणी वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी रस्त्यावर उतरले असून त्यांचेही प्रयत्न अपुरे पडत आहेत…शिमगा उत्सवामुळे अनेकांनी गावचा रस्ता धरला. त्यामुळे महामार्गावर एकच वाहनांची संख्या वाढली. त्यामुळे या महामार्गावरील वाहतूक कोंडी नित्याचीच बनली जाते कोकणातील कोकणवासीयांची संख्या मुंबईत मोठी आहे कोकणात जाण्यासाठी हाच प्रमुख मार्ग आहे त्यामुळे प्रत्येक सणाला आणि सुट्ट्यांच्या काळात वाहतूक कोंडी ठरलेली असते.एसटी,खासगी बस, खासगी वाहने, रिक्षा आणि लहान मालवाहू वाहनांमुळे वाहतूक कोंडी झाली आहे.पुढील दोन ते तीन दिवसात वाहतूक कोंडी कमी होण्याची शक्यता नाही…