मंगळूर-मुंबई वंदे भारत एकत्रीकरण तत्पर रद्द व्हावे…एकत्रीकरणामुळे कोंकणी रेल्वे प्रवाशी येणार अडचणीत…

0
25

मुंबई शिवसत्ता टाइम्स (देवेंद्र मोरे) :-

लवकरच मुंबई मडगाव आणि मंगळुरू मडगाव वंदे भारत एकत्रित होणार आहे…. यामुळे  महाराष्ट्रातील कणकवली, रत्नागिरी, खेड येथील प्रवाशांना अपुऱ्या आरक्षण कोट्यात प्रवास करावा लागणार आहे हे नक्कीच…

महाराष्ट्रातील खासदारांनी रेल्वे मंत्र्यांना तातडीने भेटून हे एकत्रीकरण न करता मंगळुरू मुंबई स्वतंत्र वंदे भारत सुरू करण्याची मागणी करण्याची आवश्यकता आहे… आपल्या खासदारांशी कोण संपर्क साधणार ? बरेच असफल प्रयत्न झाले… पण अद्यापतरी कोणते पत्र किंवा भेटीची बातमी नाही….. मंगळुरू मडगाव वंदे भारत पुरेशा प्रवाशांअभावी बंद होणार या एका अफवेमुळे कर्नाटकातील खासदारांनी रेल्वे मंत्रालय हलवून सोडले…. त्यातूनच हा वंदे भारत एकत्रीकरणाचा निर्णय घेण्यात आला आहे… आता महाराष्ट्रातल्या लोकप्रतिनिधींनी हाच कित्ता गिरवणे आवश्यक आहे….

महाराष्ट्रातील लोकप्रतिनिधी खासदार, आमदार यांना जनतेने निवडून देऊन संसदेत, विधानसभेत पाठवायचे आणि अचानक आलेल्या समस्या सोडविण्यासाठी परत मतदारांनी जागे करायचे ? लोकप्रतिनिधींनो आपल्या कर्तव्याशी तत्पर रहा.. आपापल्या मतदार मायबापांची वेळीच खबरदारी घ्यावी….