नेरळ शिवसत्ता टाइम्स (संदेश साळुंके):-
कर्जतच्या वादग्रस्त कोल्हारे ग्रामपंचायतीत रात्रीस खेळ सुरू असल्याचे समोर आले आहे…या ग्रामपंचायतीचे टाळे मध्यरात्री उघडून काहीतरी काळेभेरे सुरू असल्याची माहिती मिळताच काही जागरूक ग्रामस्थांनी याठिकाणी धाव घेतली… त्यामुळे दरवाजा उघडा टाकून हे कर्मचारी पाय लावून पळाले…दरम्यान इतक्या रात्री ग्रामपंचायत कार्यालय उघडलेच का? कोणती महत्त्वाची कागदपत्रे तर पळवली नाहीत ना,असा सवाल करण्यात येत असून या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी होत आहे…
कर्जत तालुक्यात असलेली कोल्हारे ग्रामपंचायत नेहमीच या ना त्या कारणाने वादत राहिली आहे. असे असताना २५ मार्चच्या मध्यरात्री कोल्हारे ग्रामपंचायत काही कर्मचाऱ्यांनी उघडल्याने उलटसुलट चर्चा सुरू आहे…दरम्यान ग्रामपंचायत कार्यालय उघडल्याची माहिती मिळताच काही जागरूक गावकऱ्यांनी या ठिकाणी धाव घेतली…यावरून ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला असून कोणाच्या परवानगीने परस्पर कार्यालय उघडले गेले…ग्रामसेवकाची परवानगी होती का?असा सवाल नागरिकांनी केला आहे…या संपूर्ण घटनेची हकीकत सचिन मोरे,कर्मचारी व सरपंच यांनी शिवसत्ता टाइम्सच्या प्रतिनिधी यांच्याशी बोलताना सांगितले आहे…पाहुयात काय स्पष्टीकरण दिले आहे