सतर्कता बाळगा जगात २.७ टक्केच पिण्यायोग्य पाणीसाठा शिल्लक… भूगर्भातील पाण्याची पातळी खालावल्याने जागतिक विवंचना…

0
52

मुंबई शिवसत्ता टाइम्स (देवेंद्र मोरे):-  

जगातील २.७ टक्के पाणी पिण्याच्या योग्यतेचे उरलेले आहे… सर्व भारतीयांना विनम्र आवाहन की, या संकटाला एकजूटीने सामोरे जाऊया… दक्षिण आफ्रिकेतील राजधानीचे शहर जगातील पहिले पाण्यासाठी तडफडणारे शहर म्हणून जगासमोर आले आहे, अगदी सांगू नये आणि ऐकू नये अशी येथील पाण्याची बिकट परिस्थिती आहे… जगाचा हा दुःखद प्रवास शेवटी कोणाच्याही वाट्याला येईल, त्यामुळे पाण्याचा जपून वापर करायला हवा. महाराष्ट्रातील लातूर मध्ये रेल्वेने पाणी पाठवले जात असे हे तर सर्वांनाच ज्ञात असावे… सद्यस्थितीत सर्व धरणांची पाणी-पातळी घटल्याने भूगर्भातील पाण्याची पातळी खोलवर गेलेली आहे, हे दखलंदाज करून चालणार नाही.एक जबाबदार नागरिक म्हणून आपण पाण्याचा अपव्यय थांबवून पाण्याची बचत नक्कीच करू शकतो… यासाठी कार, बाईक, अंगण, जीने, फरशी धुणे टाळा किंवा धुताना कमीतकमी पाण्याचा वापर करावा… नळगळती वेळच्या वेळीच दुरुस्त करून घ्यावी, नळ सतत सोडून ठेवणे, रस्त्यावर पाणी शिंपणे टाळा…

पाणी पितांना हवे तेवढेच पाणी ग्लासात घ्यावे तसेच झाडांच्या कुंड्यांमध्ये आवश्यक तेवढेच किंवा कमीतकमी पाणी घालण्याची पद्धत अजमावी.हे सर्व जबाबदारीने ठरवून केले तर निरर्थक पाणी वाया जाण्यापेक्षा पाण्याची बचत होईल व पाण्याचे भयानक संभाव्य दुर्भिक्ष टाळणे मुळीच अवघड होणार नाही.रोज सारख्याच बातम्यांच्या गु-हाळाचा (गुर्हाळाचा) भंडारा लुटवण्या परिस हे विश्व स्तरावरील “जल-सुरक्षितता” संबंधित निवेदन लोकांत संबोधित केल्यास लोककल्याणी जीवनमूल्यांचे संदेश सर्वोच्च हे नक्की…