मुंबई शिवसत्ता टाइम्स ( देवेंद्र मोरे ) :-
आज ३१ मार्च… डॉ. आनंदीबाई गोपाळराव जोशी.. पहिल्या भारतीय महिला डॉक्टर यांचा जन्मदिन.. प्रथम त्यांच्या स्मृतीस अभिवादन करून जाणून घेऊ त्यांची जीवनगाथा…मूळ भारतीय संस्कृतीच्या पण सातासमुद्रापार जाऊन पहिल्या भारतीय महिला डॉक्टर होण्याचा त्यांनी मान मिळवला.
डॉ. आनंदीबाई जोशी यांचा जन्म ३१ मार्च १८६५ रोजी त्यांच्या आजोळी पुण्यात झाला. त्यांचे पुर्वाश्रमीचे नाव यमुना होते. जुन्या कल्याण परिसरातील पारनाका येथील गणपतराव अमृतेश्वर जोशी यांच्या आनंदीबाई जेष्ठ कन्या होत्या.वयाच्या अवघ्या ९व्या वर्षीच त्यांच्याहून तब्बल २० वर्षांनी मोठे असलेल्या अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर येथील गोपाळराव जोशी यांच्या बरोबर विवाहबद्ध झाल्या आणि आनंदीबाई गोपाळराव जोशी झाल्या. पुढे वयाच्या १४व्या वर्षी त्यांनी एका मुलाला जन्म दिला पण योग्य वैद्यकीय उपचाराविना त्यास फक्त १० दिवसांचेच आयुष्य लाभले. आनंदीबाईंच्या जीवनात हा महत्त्वाचा टप्पा ठरला. या घटनेनंतर त्यांनी डॉक्टर होण्याचे मानस निश्चित केले.
गोपाळराव जोशी लोकहितवादी यांची शतपत्रे वाचीत असतं, आपल्या पत्नीला आनंदीबाईंना शिक्षणात रस आहे हे त्यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी या शतपत्रांच्या वाचनाने प्रेरीत होऊन आपल्या पत्नीला इंग्रजी शिकवण्याचे ठरवले. गोपाळरावांनी आनंदीबाईंना मिशनरी शाळांमध्ये प्रवेश मिळावा म्हणून प्रयत्न सुरु केले.
डॉ. आनंदीबाई जोशी यांचा जन्म ३१ मार्च १८६५ रोजी त्यांच्या आजोळी पुण्यात झाला. त्यांचे पुर्वाश्रमीचे नाव यमुना होते. जुन्या कल्याण परिसरातील पारनाका येथील गणपतराव अमृतेश्वर जोशी यांच्या आनंदीबाई जेष्ठ कन्या होत्या.वयाच्या अवघ्या ९व्या वर्षीच त्यांच्याहून तब्बल २० वर्षांनी मोठे असलेल्या अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर येथील गोपाळराव जोशी यांच्या बरोबर विवाहबद्ध झाल्या आणि आनंदीबाई गोपाळराव जोशी झाल्या. पुढे वयाच्या १४व्या वर्षी त्यांनी एका मुलाला जन्म दिला पण योग्य वैद्यकीय उपचाराविना त्यास फक्त १० दिवसांचेच आयुष्य लाभले. आनंदीबाईंच्या जीवनात हा महत्त्वाचा टप्पा ठरला. या घटनेनंतर त्यांनी डॉक्टर होण्याचे मानस निश्चित केले.
गोपाळराव जोशी लोकहितवादी यांची शतपत्रे वाचीत असतं, आपल्या पत्नीला आनंदीबाईंना शिक्षणात रस आहे हे त्यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी या शतपत्रांच्या वाचनाने प्रेरीत होऊन आपल्या पत्नीला इंग्रजी शिकवण्याचे ठरवले. गोपाळरावांनी आनंदीबाईंना मिशनरी शाळांमध्ये प्रवेश मिळावा म्हणून प्रयत्न सुरु केले.
गोपाळराव जोशी कल्याणला पोस्ट ऑफिसात कारकून होते. नंतर त्यांची अलिबाग येथे आणि त्यानंतर त्यांची कलकत्ता येथे बदली झाली. त्यांनी कलकत्त्याला बदली घेतल्यावर तेथे आनंदीबाईंना त्यांनी संस्कृत आणि इंग्लिश वाचणे, बोलणे व लिहिणे शिकवले. त्यांच्या त्या काळात विवाहित स्त्रियांनी चूल आणि मुल सांभाळावे अशी धारणा असणाऱ्या सामाजिक रूढी त्यांना रुचणाऱ्या नव्हत्या, ते पुरोगामी विचारांचे होते आपल्या पत्नीने खूप शिकावे तिच्या इच्छेप्रमाणे तिने डॉक्टर बनावे असा त्यांचा आग्रह असे. इतर आपल्या पत्नीने स्वयंपाक धड केला नाही तर तिला मारझोड करीत असत पण इथे गोपाळराव पत्नीला अभ्यास केला नाही तर ओरडत असत.
एकीकडे सावित्रीबाई व ज्योतिबा फुले स्त्री शिक्षणासाठी प्रयत्न करीत असतानाच आनंदी-गोपाळ हे जोडपे ध्येयपूर्तीसाठी झटत होते. पुढे अमेरिकेत जाऊन डॉक्टर होऊन आनंदीबाई भारतात आल्या मात्र क्षयरोग झाल्याने वयाच्या २१व्या वर्षीच त्यांची प्राणज्योत मालवली. १६ फेब्रुवारी १८८७ साली त्यांचा पुण्यात दुर्दैवी अंत झाला. यामुळे आनंदीबाई जोशी यांच्या ज्ञानाचा आणि बुद्धीमत्तेचा उपयोग भारतातील जनतेस झाला नाही पण त्याकाळात चूल आणि मूल हेच जीवन समजणाऱ्या भारतीय महिलांच्या मनामनांत स्त्री-शिक्षणाचा आदर्श आणि मानदंड डॉ. आनंदीबाई जोशी यांनी घालून दिला.