माणगाव शासकीय रुग्णालयाच्या हलगर्जीपणाचा भोंगळ कारभार समोर… गौरांग गायकर १४ वर्षीय बालकाचा उपचार न करताच घरी पाठविले…

0
36

माणगाव शिवसत्ता टाइम्स (दिपक दपके):- 

रायगडमधील माणगाव उपजिल्हा रुग्णालयाच्या भोंगळ कारभारामुळे धक्कादायक प्रकार समोर आला आहे. उपचाराविनाच जबरदस्तीने घरी पाठविलेल्या एका शाळकरी मुलाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.म्हसळा तालुक्यातील घुम गावातील सातवीमध्ये शिकणाऱ्या गौरांग दिनेश गायकर या मुलाचा योग्य उपचारा अभावी मृत्यू झाल्याची घटना रविवार दि. 6 एप्रिल रोजी घडली आहे.गौरांग  यांच्या मृत्युने घूम गावासह संपूर्ण तालुक्यात शोककळा पसरली असून या मृत्युला माणगाव उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर जबाबदार असल्याचे आरोप त्याचा कुटुंबीयांनी केला आहे…      याबाबत सविस्तर माहिती अशी की,गौरांग यांच्या पायावर केस पूळी आल्याने त्याला शुक्रवारी म्हसळा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले होते…यानंतर शनिवारी त्याला अचानक ताप भरल्याने रात्री १०:३० वाजण्याच्या सुमारास पुन्हा म्हसळा ग्रामीण रुग्णालयात भरती करण्यात आले. गौरांग याला ताप जास्त प्रमाणात असल्याने डॉक्टरांनी सलाईन लाऊन त्याला स्टेबल केले व पुढील उपचारासाठी माणगाव उपजिल्हा रुग्णालयात घेऊन जाण्याचा सल्ला दिला…म्हसळा ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरांच्या सल्ल्याने गौरांगला त्याचवेळी रात्री १ वाजेपर्यंत माणगाव रुग्णालयात उपचारासाठी नेले…त्यावेळी तेथील डॉक्टरांनी याला तर केस पुळी झाले, यावेळी ताप येतोच, एवढ्या छोट्या गोष्टीसाठी १०८ ची रुग्णवाहिका कशाला आणायची, म्हसळयाचा डॉक्टरांना काही समजत नाही का?असे बोलून विनाउपचार करता त्यांना घरी पाठवले…त्यानंतर घरी आल्यावर गौरांगचा अचानक मृत्यू झाला…पोलिसांनी दिलेल्या जबाबात गौरांगच्या वडिलांनी ही माहिती दिली आहे… डॉक्टरांनी    गौरांगला उपचारासाठी ठेवले असती तर तो सर्वांसोबत असता अशी भावना ग्रामस्थानी व्यक्त केली…गौरांगवर उपचार न करणाऱ्या डॉक्टरवर गुन्हा दाखल करून त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी त्याच्या कुटुंबांकडून व शिवसेना माणगावतर्फे करण्यात आली…