तरुणांनी शिक्षण घेऊन आपले अस्तित्व निर्माण करावे: प्रसाद पांढरे… तरुण पिढीला शिक्षण व संस्काराकडे घेऊन जाणे काळाची गरज…

0
23

रायगड शिवसत्ता टाइम्स (धम्मशील सावंत):-

भारतीय संस्कृतीची जगाला सर्वात मोठी देणगी आहे… शुद्ध आचार-विचार, चांगले संस्कार स्वतः आचरण करणे, जगा आणि जगू द्या… असे वर्तन पाहिजे… भारताची सर्वात मोठी सामर्थ्यवान शक्ती म्हणजे विद्यार्थी… या विद्यार्थ्याने समाजजीवनात आदर्शवत वाटचाल करून पुढे स्वतःच्या भवितव्याबरोबरच देशाच्या उज्वल भवितव्यासाठी योगदान दिले पाहिजे…

यासाठी तरुण पिढीला शिक्षण व संस्कारा कडे घेऊन जाणे ही काळाची गरज आहे… पंचवीस वर्षाचा विद्यार्थी होईपर्यंत त्याच्या बोलण्या-चालण्यातून व वागण्यातून भारतीय संस्कृती चे अनुकरण होईल याकडे लक्ष दिले पाहिजे. उच्च दर्जाचे शिक्षण घेऊन स्वकर्तृत्वावर तरुणांनी आपले अस्तित्व निर्माण करावे असा मौलिक संदेश वडखळ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रसाद पांढरे यांनी युवा पिढीला दिला. याबरोबरच सण व उत्सवात शांतता, सलोखा, एकोपा व बंधुभाव राखला जावा, प्रबोधनात्मक व जनजागृतीपर कार्यक्रम राबविले जावेत… यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन देखील पोलीस निरीक्षक प्रसाद पांढरे यांनी केले…