आता नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात होणार १ एप्रिल पासून… तब्बल ३४ वर्षांनी शैक्षणिक पद्धतीत बेरोजगारी मुक्तीसाठी बदल…

0
29

मुंबई शिवसत्ता टाइम्स (देवेंद्र मोरे):- 

शिक्षण व्यवस्थेत नवीन शैक्षणिक धोरणांमुळे गुणात्मक बदल होणार आहेत… या धोरणांमुळे पारंपरिक शिक्षण पद्धतीतून केवळ बेरोजगारांचे लोंढे तयार न करता विद्यार्थ्यांना कौशल्यही आत्मसात करता येणार आहेत… शिक्षणातून कौशल्य आत्मसात करेपर्यंत देशाला सक्षम करता येणार नाही… तरुणाईसाठी शैक्षणिक क्षेत्रातील बदल महत्त्वाचे ठरणार आहेत, असे आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित सेवानिवृत्त शिक्षक श्री. रमेश विरनवार यांनी संबोधित केले आहे…

सध्याच्या पूर्व-प्राथमिक शिक्षण पद्धतीवर अंकुश ठेवण्यासाठीचा कायदा तयार करण्याचे काम सुरू आहे, असे राज्य शालेय शिक्षण मंडळाने स्पष्ट केले…. यंदा इयत्ता पहिलीची पुस्तके “सीबीएसई” अभ्यासक्रमानुसार उपलब्ध करून दिली जाणार आहेत… “सीबीएसई” अभ्यासक्रम थोड्या फार प्रमाणात सध्या समाविष्ट करण्यात आला आहे… टप्प्याटप्प्याने पुढील बदल करण्यात येतील… या माध्यमातून शाळांची गुणवत्ता तपासली जात आहे…

“पीएमश्री” शाळांच्या धर्तीवर राज्यात “पीएमश्री” शाळा सुरू करण्यासाठी राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी अनुकूलता दर्शविली आहे… यात प्रामुख्याने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांचा समावेश असणार आहे… यामधून विद्यार्थ्यांना पारंपरिक शिक्षणासह त्यांच्या आवडीच्या क्षेत्रातातील प्रशिक्षणाची संकल्पना आहे…. जिल्हा व तालुका स्तरावर अधिकृत समन्वयाने तब्बल ३४ वर्षांनी देशातील तरुणाईच्या सर्वांगीण उन्नतीसाठी व बेरोजगारीच्या मुक्तीसाठी शैक्षणिक पद्धतीत बदल करण्याचा हा महत्त्वाकांक्षी शासन-निर्णय आहे…