कर्जत शिवसत्ता टाइम्स (संदेश साळुंके):-
कोल्हारे ग्रामपंचायत ही सतत वादाच्या भोवऱ्यात असताना तारामती तांबोळी यांनी ग्रामपंचायत कोल्हारे व गटविकास अधिकारी यांच्याकडे एक वर्षापूर्वी म्हणजेच फेब्रुवारी २०२४ रोजी आपल्याला गावठाण जागेतून येणारा रस्ता हा संजय वीरले यांनी अडवल्या बाबत तक्रारी अर्ज केला होता…परंतु अध्याप या सरकारी जागेतून त्यांचा रस्ता खुला करून न दिल्यामुळे त्यांनी पुन्हा सरकार कडे दाद मागितली आहे.
तसेच तारामती त्यांनी २६.०८.२०२४ रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी रायगड, जिल्हाधिकारी रायगड, तहसीलदार कर्जत यांच्याकडे लेखी निवेदनातून दाद मागितली परंतु अध्याप त्यावर कोणतीच कार्यवाही झाली नाही म्हणून त्यांनी आपली विवंचना मांडून न्याय न मिळाल्यास उपोषणाचा इशारा दिला आहे.व आपली वहिवाट दाखून बंद केलेला रस्ता खुला करून द्यावा तसेच अर्धा केलेले कॉंक्रीट रस्ता पुढे करण्यात यावा अशी मागणी केली आहे…ग्रामपंचायत कोल्हारे हे तारामती तांबोळी यांना न्याय देणार का? याकडे सर्वांचे लक्ष वेधून आहे…