माणगाव शिवसत्ता टाइम्स (नरेश पाटील) :-
पवित्र रमजान महिन्यात, संपूर्ण जगभरातील मुस्लिम रोजा पाळतात. पण फक्त अन्न-पाण्यापासून दूर राहणं एवढंच रोजाचं स्वरूप नाही; हे एक आत्मिक, मानसिक आणि शारीरिक शुद्धीकरण आहे. रोजा फक्त मुस्लिमांसाठी नाही, तर संपूर्ण मानवजातीसाठी एक संदेश आहे — संयम, सहानुभूती, भावंडत्व आणि स्वतःच्या कर्मांवर विचार करण्याचा विषय बाबत डॉ. पारनेकार यांनी माणगाव येते द. ग. तटकरे महाविद्यालय येते आयोजित ईद मिलन आणि रोजा या पवित्र विषय पर आयोजित कार्यक्रम प्रसंगी मंगळवारी दि. 15 रोजी बोलताना व्यक्त केले. सदर कार्यक्रम येतीलचे शिक्षक तसेच कार्यलीन कर्मचारी करीता आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी डॉ. पारनेकार सह प्राचार्य बी.एम.खामकर सर, उप प्राचार्य डॉ. राजेंद्र आचार्य सर, प्राध्यापक डॉ. पांडे सर, वरिष्ठ लिपिक सतीश केकाणे, ग्रन्थ विभागाचे प्रमुख डॉ. संगीता उत्तेकर सह अनेक विषय शाखातील प्रमुख शिक्षक आणि कार्यलीन कर्मचारीमोठया संख्येने उपस्थित होते.
या दरम्यान डॉ. रफिक पारनेकार यांनी बोलताना एक अल्लाह, एक मानवता कुराण त्याच्या सुरुवातीपासूनच एकतेचा संदेश देते केवळ अल्लाह एक आहे असं नव्हे, तर संपूर्ण मानवजात एका जोडप्यातून निर्माण झाली आहे. यामुळे भावंडत्व (भाईचारा) हा रोजाच्या केंद्रस्थानी येतो. सर्व संत-महंत आणि प्रेषित — कोणत्याही धर्मातले असोत — यांनी सत्य, करुणा आणि नीतीमत्ता या मूलभूत मूल्यांचा पुरस्कार केला आहे. आपला भारतीय संविधान देखील बंधुता (fraternity) यावर भर देतो, जो हाच कुराणमधील विचार आहे. शाळेमध्ये आपण दररोज एक प्रतिज्ञा म्हणतो — सर्व भारतीय माझे बांधव आहेत — ही फक्त शब्दांची ओळ नाही, तर रोजा हाच याचा धार्मिक आणि नैतिक मूळ आहे. रोजा एका हेतूने उपवास रोजा म्हणजे केवळ उपवास नाही, तर शरीर, मन आणि आत्मा यांचं शुद्धीकरण आहे. हे शिकवतो ‘तकवा’ म्हणजेच अल्लाहची भीती आणि आपली जबाबदारी. खरं रोजा तेव्हाच होतो जेव्हा केवळ पोटच नाही, तर आपली डोळे, जीभ, कान, हात, आणि हृदय देखील पापांपासून दूर राहतात.
विज्ञानाच्या दृष्टिकोनातून, सगळे माणसे सारखीच आहेत… तेच अवयव, तेच रक्त, तेच मूलभूत गरजा. धर्म वेगळा असू शकतो, पण मानवता एकच आहे. रोजा ही भूक सर्वांना सारखीच लागते हे शिकवून, गरीब-श्रीमंतांतील दरी मिटवतो. रोजाची शहाणीव केवळ धार्मिक नाही. हे व्यावसायिक, विद्यार्थी, आणि नेते सर्वांना चरित्र जपणं, वाईट कामांपासून दूर राहणं, आणि आत्मविकास करण्यासाठी मार्गदर्शन करतं. जर रोजा करताना माणूस खोटं बोलेल, फसवणूक करेल, इतरांना त्रास देईल, तर त्या रोजाला अर्थ उरत नाही. तो फक्त एक रीतिरिवाज बनतो ज्याला आत्मा नाही. “जसं बी पेराल, तसं पीक उगवेल” हेच यामागचं तत्त्वज्ञान आहे. पुढे जीवन, मृत्यू आणि कर्म या बाबत विश्लेषण करताना म्हणाले की रोजा आपल्याला आत्मपरीक्षण करायला शिकवतो. आपलं जीवन हे एक परीक्षासदृश आहे. मृत्यू (मृत्यू अटल) आहे. आपल्याबरोबर काहीच जात नाही ना धन, ना नातेवाईक, फक्त कर्म. जन्म हा एक आनंद असतो, आणि मृत्यू हे आपल्या कर्माचं फीडबॅक. तर सर्वांसाठी एक संदेश की ईद मिलन, रमजानच्या शेवटी येणारा उत्सव, केवळ मुस्लिमांचा नाही. हा एक स्मरण आहे शांती, करुणा, आत्मसंयम आणि एकतेच्या मूल्यांचं. आजच्या विज्ञान युगात, जिथे धर्म, भाषा, जात यामुळे माणसं दुरावली आहेत, तिथे रोजा जोडण्याचं काम करतं. रोजा हे मानवतेचं प्रतीक आहे… धर्माच्या पलीकडचं. कुराण आणि रोजा यांचा संदेश आपण फक्त धार्मिक नव्हे तर मानवतेच्या दृष्टीने समजून घेतले पाईजे. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जमाते इस्लामी हिंद जिल्हा रायगड चे आयोजक फसिहउद्दीन फलाही, माणगाव ता माणगाव शहरचे अध्यक्ष बशीर करेल व त्याचे टीम यांनी विशेष मेहनत घेतले तर कार्यक्रम चे प्रस्तावना पांडे सर यांनी केले तर स्वागत व आभार आचार्य सर यांनी केले…