रायगड जिल्ह्यातील शेकापच्या पाटील बंधूंमध्ये घरघर… कमळाच्या‌ संगतीने भावाभावामध्ये घडताहेत दुस्वास…

0
52

अलिबाग शिवसत्ता टाइम्स (धनंजय कवठेकर):- 

राजकारणात कधी काय घडेल याचा नेम नाही आणि कोण कोणासोबत जाईल याचा भरवसा नाही असे नेहमीच घडते…मात्र हेच राजकारण एखादे घर फोडते आणि रक्ताच्या नात्यात देखील वैर निर्माण करते असाच काहिसा प्रकार रायगड जिल्ह्यात घडलाय राजकारणात डावपेच टाकताना दोन सख्ये भाऊ मात्र पक्के वैरी झालेत…

रायगड जिल्ह्यातील राजकारण म्हटले कि पहिले नाव यायचं ते शेकापचे. जिल्हा परिषदेवरती अनेक वर्षे निर्विवादपणाने एक हाती सत्ता गाजवली…चार..चार ..आमदार…दोन मंत्री…अधूनमधून खासदारकी एवढे सगळे भोगले ते केवळ पाटील या एकाच आडनावाच्या हिंमतीवरती आता याच पाटील घरण्यात उभी फूट पडली संघर्ष करून शेकाप वाढविणाऱ्या जयंत पाटील यांच्या सख्या लहान बंधूनेच त्यांची साथ सोडून कमळाची वाट धरली पंडित पाटील यांच्या भाजपा प्रवेशावरती आता घरातील छुपा विरोधक उघड झाल्याची खोचक प्रतिक्रिया जयंत पाटील यांनी व्यक्त केली

एरव्ही मोठ्या भावाचा शब्द प्रमाण मानून काम करणारे पंडित पाटील अनेक वेळा जिल्हा परिषद अध्यक्ष झाले 2014 साली आमदारही बनले मात्र कधी पक्षाचे नियम डावलले नाहीत कि कधी जयंत पाटील यांचा शब्द मोडला नाही यावेळी मात्र पंडित पाटील यांनी मौन सोडले आणि थेट आरोप केले…

जिल्ह्याच्या राजकारणात एकहाती सत्ता घेणारा शेकापक्ष आज मात्र पुरता जर्जर बनल्याचे चित्र निर्माण झाले आहे जिल्‍हयात एकही आमदार नाही उलट जे आहेत त्यापैकी अनेकजण एकामागून एक पक्ष सोडत आहेत त्यातच दोन सख्या भावांनी आता एकमेकांसमोर दंड थोपटल्याने राजकारण नेमकं कोणत्या थराला जातय हे पहाणे देखील तितकेच महत्वाचे राहणार आहे…