अलिबाग शिवसत्ता टाइम्स (धनंजय कवठेकर):-
महसूल विभागातर्फे जिल्ह्यातील सर्व गावामध्ये जिवंत सातबारा मोहीम सुरू करण्यात आली आहे. अलिबाग तालुक्यातही ही मोहीम १ मार्चपासून सुरू झाली आहे. यामध्ये मृत खातेदाराच्या वारसांची नोंद करून घ्यायची आहे. मात्र न्यायप्रविष्ट प्रकरणातील मृत खातेदारांची नावे चढवली जाणार नाहीत, अशी माहिती अलिबाग तहसीलदार विक्रम पाटील यांनी दिली. याबाबत अलिबाग तहसील कार्यालयात मंडळ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन लवकर नोंदणी करून घेण्याच्या सूचना दिल्या आहेत…
राज्यातील मृत खातेदार यांच्या वारसाची नावे सातबाऱ्यात लावण्यासाठी शासनातर्फे शंभर दिवस कृती आराखडा अंतर्गत जिवंत सातबारा मोहीम राबविण्यात येत आहे. १ मार्चपासून या मोहिमेची सुरुवात करण्यात आली… अलिबाग तालुक्यातही १ मार्चपासून मोहीम राबविण्यास सुरुवात केली. गुरुवारी १७ एप्रिल रोजी तहसीलदार विक्रम पाटील यांनी कार्यालयात मोहिमेचा आढावा घेण्यासाठी बैठक आयोजित केली होती…