मुंबई शिवसत्ता टाइम्स (देवेंद्र मोरे):-
मुंबईतील परळ आणि प्रभादेवीला जोडणारा आणखी एक ब्रिटिश कालीन ओव्हर ब्रिज पाडला जाणार आहे. यामुळे काही काळ प्रचंड वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागणार आहे. दक्षिण मुंबईतील दादर येथील टिळक पूल आणि लोअर परळ येथे झालेल्या डिलाईल रोड पुलाला समांतर असलेला हा पूल पाडल्यानंतर या दोन पुलांवर वाहतूकीचा ताण पडू शकतो. सायन पूल आधीच बंद असल्यामुळे वाहतूक कोंडीची समस्या अधिक वाढणार आहे…
मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावरील परळ आणि प्रभादेवी दरम्यानचा मोठा दुवा असलेला हा पूल एमएमआरडीए वाहतुकीसाठी बंद करून पाडकामाला सुरुवात करणार आहे, मात्र स्थानिकांना विश्वासात न घेतल्याने नागरिकांनी आता संताप व्यक्त केला आहे. MMRDA मार्फत मुंबापुरीच्या वैभवात भर टाकण्याच्या मुद्द्यावर “एल्फिन्स्टन ब्रिज” सारख्या पुरातन, जुन्या वास्तू नष्ट करतांना बाहेरून, गावाकडून “मुंबई दर्शन” साठी येणाऱ्या सर्वांना नवीन गोष्टींचे आकर्षण असते हे सर्व जरी खरे असले तरी पायाभूत सुविधांच्या माध्यमातून दाखले देत मुंबईत मोठा बदल घडवून आणण्यात MMRDA ची जोमाने वाटचाल सुरू आहे… पण त्यांची, सी-लिंक किंवा कोस्टल रोड सारखी विकास कामे मुंबईच्या वैभवात नक्कीच भर टाकणारी आहेत पण एल्फिन्स्टन ब्रिजच्या विकासकामाने स्थानिकांना आतोनात हाल सोसावे लागणार आहेत, एवढेच नाही तर या भागात मुख्यतःकेईएम, वाडीया आणि टाटा सारखे हॉस्पिटल्स आहेत जेथे महाराष्ट्रातील खेड्यापाड्यातून रोज हजारों रुग्ण येत असतात कारण ही हॉस्पिटल्स त्यांच्यासाठी देवाची मंदिरे आहेत. बाहेरून आकर्षणापोटी येणाऱ्या पर्यटकांची नाळ ओळखून पिढ्यानपिढ्या येथे राहणाऱ्या लोकांना आणि राज्याच्या कानाकोपऱ्यातून आपल्या आजारांवर येथील हॉस्पिटल्सची रामबाण ओळख ठेवणाऱ्या पिडीतांना विसरून कसे चालेल ? आणि यात कसली वैभवाची मेक ?
मुंबईच्या वैभवात भर टाकतांना अविभाज्य येथील मुंबईकरांना चिरडणार की मुंबई बाहेर फेकणार हा मुद्द्याचा विषय आहे. मूळ एल्फिन्स्टन ब्रिजचे रूपांतर नवीन डबल डेकर ब्रिज उभारून शिवडी-वरळी कनेक्टर रस्त्याच्या प्रकल्पात वरचा मार्ग शिवडी-न्हावा शेवा अटल सेतूला जोडला जाऊन खालचा रस्ता पुर्व-पश्चिम भागाला जोडणारा असेल, यामुळे अटल सेतू वरील वाहनांना थेट वरळी किंवा दक्षिण मुंबई आणि वांद्र्याच्या दिशेने प्रवास करणे शक्य होईल. पण ही सर्व विकासकामे गर्भश्रीमंतांची पूर्तता म्हटली तर अयोग्य काहीच नाही. कारण प्रस्तुत विकास कामाच्या अनुषंगाने येथे पिढ्यानपिढ्या राहणारे कुटुंब चिरडले जाणार, त्यांचे संसार-उद्योग, मुलांचे शैक्षणिक आयुष्य यांची धुळधाण होणार म्हणजे याला विकास म्हणाल तर मुळीच नाही..?
तेव्हा विकासकांनी मग ते MMRDA का असेना कुठेही विकास साधतांना तेथील मूळ स्थानिकांची तेथेच जवळपास कायम व्यवस्था करूनच एखाद्या ठिकाणचे विकासकाम हाती घ्यावे, याला सामाजिक कार्यतत्परता आणि “खरं विकास काम” म्हणता येईल… विश्वासाला वेलू असा तोडू नका… तो जनमानसाचा आहे, असं “परळ” सांगतो आहे…