रायगड शिवसत्ता टाइम्स (अमुलकुमार जैन):-
रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यातील वेळास समुद्रात आज सकाळी दोन भावासह एक नातेवाईक यांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी साडे नऊ वाजण्याच्या सुमारास घडली आहे…. मयुरेश पाटील (23), हिमांशू पाटील (21) व अवधूत पाटील (26) मृत तरुणांची नावे आहेत…. शेतकरी कामगार पक्षाचे तालुका चिटणीस, रायगड जिल्हा बँकेचे संचालक तथा म्हसळा तालुक्याचे हिंदू समाज उपाध्यक्ष संतोष पाटील यांच्यावर शनिवारी दुःखाचा डोंगर कोसळला…. पोहायला गेलेल्या आपल्या दोन मुलांसह नातेवाईक पाण्यात बुडून मृत्यू झाल्याचे समजताच त्यांच्या पायाखालची वाळूच सरकली…. या आघाताने कुटुंब, नातेवाईक आणि गावावर शोककळा पसरली आहे…
अत्यंत सुरक्षित आणि पर्यटकांना आवडणाऱ्या वेळास श्रीवर्धन या बीचवर पोहून येतो असे सांगत म्हसळा शेकापक्षाचे तालुका चिटणीस संतोष पाटील यांचा विवाहीत मुलगा अवधूत संतोष पाटील वय २६ आणि मयुरेश संतोष पाटील वय वय २३ दोघेही रा गोंडघर हे दोघे आणि त्यांचा ऐरोली मुंबई वरून कालच आलेला मित्र हिमांशू संतोष पाटील वय २१ हे तिघेही आज सकाळी वेळास श्रीवर्धन या बीचवर पोहून येतो असे आई वडिलांना सांगून सुमुद्रावर गेले ते तिघेही परत आलेच नाही… ही दुदैर्वी घटना सकाळी १०.३० च्या दरम्यान घडल्याचे दिघी सागरीच्या पोलीस सूत्रांनी सांगितले… अत्यंत सुरक्षित आणि पर्यटकांना आवडणाऱ्या वेळास श्रीवर्धन हा बीच सर्वांत सुरक्षित असून, घडलेला प्रसंग हा आमच्या गावाला व गोंडघर येथील संतोष पाटील यांना दुदैर्वी आसल्याचे पत्रकार शिलकर यांनी सांगितले… दिघी सागरी पोलीसांनी स्थानिक ग्रामस्थ, वॉटर स्पोर्ट मालक वसीम फगजी यांचे मदतीने तीनही मृतदेह तात्काळ बाहेर काढले व प्राथमिक आरोग्य केंद्रांत नेले….