रत्नागिरी शिवसत्ता टाइम्स (देवेंद्र मोरे):-
मुख्यमंत्री जेष्ठ नागरिक तिर्थक्षेत्र दर्शन योजने अंतर्गत रत्नागिरी रेल्वे स्थानकातून कोकणातून पहिली रेल्वे ८०० जेष्ठ नागरिकांना घेऊन अयोध्या दर्शनासाठी रवाना झाली. रेल्वे मार्फत या धार्मिक यात्रा स्पेशल ट्रेनला जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी यांनी हिरवा कंदील दाखवला.
शिवसेना मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांच्या मार्गदर्शनाखाली ही अतिशय महत्त्वाकांक्षी योजना जेष्ठ नागरिकांसाठी सुरू करण्यात आली होती.
या योजनेचा फायदा माझ्या रत्नागिरी जिल्ह्यातील जेष्ठ नागरिकांना होत असल्याने अतिशय आनंद होत असल्याची प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.
याप्रसंगी रत्नागिरी जिल्ह्याचे अप्पर जिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे, सहाय्यक आयुक्त दीपक घाटे, जनसंपर्क अधिकारी संजय भोसले, पर्यटन सहाय्यक व्यवस्थापक संजय शर्मा, टूर मॅनेजर लोकेश यादव, प्रांताधिकारी जीवन देसाई, शिवसेना जिल्हाप्रमुख राहुल पंडित, तालुका प्रमुख बापू म्हाप, माजी नगराध्यक्ष बंड्याशेठ साळवी, रत्नागिरी शिवसेना शहरप्रमुख बिपिन व पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
या यात्रेत दरम्यान माझ्या जेष्ठ वडीलधाऱ्या नागरिकांना कोणत्याही गोष्टीची कमी पडू नये याची काळजी घेण्याची सुचना यावेळी करून हव्या त्या उपाययोजना माझ्या वतीने करण्यात येतील अशी यावेळी पालकमंत्र्यांनी दिली.