ग्रामसंपर्क अभियानाअंतर्गत स्वच्छता अभियान… दहिसर येथे स्वच्छता अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद… 

0
18

दहिसर(चौदा गाव) शिवसत्ता टाइम्स (गुरुनाथ पाटील) 

ग्राम संपर्क अभियान अंतर्गत कल्याण ग्रामीण मंडळ क्रमांक ५ च्या चौदा गावांमध्ये बुथ क्रमांक ४०८ व ४०९ दहिसर येथे स्वच्छता अभियानाचे आयोजन करण्यात आले. या अभियानाला कार्यकर्त्यांचा मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद लाभला…

स्वच्छता मोहिमेत १४ गाव मंडळ अध्यक्ष श्री सुनील म्हसकर यांच्यासह जिल्हा ओबीसी युवा मोर्चा अध्यक्ष श्री चेतन पाटील, जिल्हा उपाध्यक्ष श्री गुरुनाथ वसंत पाटील, तसेच श्री महादेव जाधव, प्रभाकर पाटील, संदेश पाटील, मोहन पाटील, गुरुनाथ रा. पाटील, तुषार पाटील, मयुर पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

स्वच्छता मोहिमेअंतर्गत गावातील सार्वजनिक ठिकाणी साफसफाई करण्यात आली. रस्ते, चौक, शाळा परिसर व मंदिराभोवती स्वच्छतेचे काम करण्यात आले. परिसर स्वच्छ ठेवा, प्लास्टिकचा वापर टाळा, असे आवाहन यावेळी करण्यात आले. स्थानिक ग्रामस्थांनीही या उपक्रमाला सहकार्य करत स्वच्छतेबाबत जागरूकता निर्माण केली.

कार्यक्रमादरम्यान उपस्थित मान्यवरांनी स्वच्छतेचे महत्त्व अधोरेखित केले. त्यांनी सांगितले की, स्वच्छ परिसर हेच आरोग्याचे गमक आहे. स्वच्छ भारत अभियानाच्या प्रेरणेने आपण प्रत्येक गाव स्वच्छ व सुंदर करण्यासाठी प्रयत्नशील राहायला हवे. गावकऱ्यांनी आपापल्या परिसरात नियमित स्वच्छता राखण्याचे आणि घनकचरा व्यवस्थापन योग्य प्रकारे करण्याचे वचन दिले.

या स्वच्छता अभियानामुळे ग्रामस्थांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. सर्व सहभागी कार्यकर्त्यांनी प्रामाणिकपणे श्रमदान करत स्वच्छतेसाठी आपली बांधिलकी सिद्ध केली. स्वच्छतेसाठी केलेला हा उपक्रम पुढील काळात सातत्याने राबवण्याचा निर्धारही यावेळी करण्यात आला.

ग्रामसंपर्क अभियानाच्या माध्यमातून गावागावात केंद्र सरकारच्या विविध योजनांची माहिती पोहोचवण्याबरोबरच, स्वच्छतेसारख्या सामाजिक उपक्रमांतून जनजागृती घडवण्याचे कार्य यशस्वीरीत्या पार पडत आहे.