मुंबई शिवसत्ता टाइम्स (देवेंद्र मोरे):-
सन् १८८६ मध्ये अमेरिकेतील शिकागो शहरात कामगारांनी आठ तासांच्या कामाच्या मागणीसाठी आंदोलन केले होते, परिणीती स्वरुप हे आंदोलन यशस्वी होऊन कामगारांच्या मागण्या मान्य करण्यात आल्या तो १ मे हा दिवस होता…
तर स्वातंत्र्यप्राप्ती नंतर भारतीय उपखंड विविध प्रांत व प्रदेशांमध्ये विभागला गेला होता… यात बहुतेकदा भाषिक किंवा सांस्कृतिक आत्मियतेपेक्षा प्रशासकीय सोयीकडे अधिक कल होता. सुरुवातीला गुजरात आणि मुंबईसह मराठीबहुल भाग मिळून “मुंबई राज्य” म्हणून निर्माण करण्यात आले. पण येथील गुजराती भाषिकांना झुकते माप मिळे, याचाच परिणाम म्हणून मराठी भाषिक जनतेने संपूर्ण स्वतंत्र मराठी राज्याच्या मागणीसाठी तीव्र आंदोलन छेडले. या संग्रामात पोलीसांच्या गोळीबारात १०६ हुतात्मे झाले… अखेर १ मे १९६० या दिवशी भाषावार आताच्या महाराष्ट्र राज्याची निर्मिती करण्यात आली. या लढ्यात १०६ आंदोलक बळी गेले. दक्षिण मुंबईतील फोर्ट भागात बलिदान दिलेल्या आंदोलकांच्या स्मरणार्थ “हुतात्मा स्मारक” साकारण्यात आले आहे.
१ मे या दिवशी या ठिकाणी प्रत्येक मराठी माणूस या १०६ हुतात्म्यांना आदरांजली वाहण्यास महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून येतो. १ मे या दिवशी हा हुतात्मा चौक मिरवणुका, सभा याद्वारे या १०६ हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहण्यास येणाऱ्या लोकांनी फुललेला असतो…
शिवसत्ता टाइम्सच्या यू-ट्युब वाहिनीच्या सर्व कार्यकारी पत्रकार वृंदाच्या वतीनेही महाराष्ट्र राज्य निर्मितीच्या आंदोलनातील या सर्व हुतात्म्यांना भावपूर्ण आदरांजली व कोटी कोटी प्रणाम… !
जय महाराष्ट्र.. !