माझी तक्रार करता…जा अतिक्रमण हटवत नाही !… सहायक नगर रचनाकार  साहिल गाढवेंचा मोबाईलवर सज्जड दम…

0
13

खोपोली शिवसत्ता टाइम्स (खलील सुर्वे):- 

खोपोली नगर परिषदेतील अधिकारी व कर्मचारी यांची मुजोरी…भ्रष्ट्राचार, कामचुकारपणा या नित्यनेमाच्या असल्याचे दिसून येत आहे. याबाबतचे नवीन उदाहरण समोर आले असून वारंवार तक्रारी करून ही अतिक्रमण हटविण्यात येत नसल्याने तक्रारदार पत्रकार शिवाजी जाधव यांनी रायगड जिल्हाधिकारी व कोकण आयुक्त यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे. दरम्यान, पत्रकार जाधव यांनी तक्रार केल्याने खोपोली नगर परिषदेचे सहायक नगर रचनाकार साहिल गाढवे यांची तक्रार केल्याने गाढवे यांनी मोबाईलवरून जाधव यांना सज्जड दम दिला आहे.

माझी तक्रार करता…जा अतिक्रमण हटवत नाही,अशा शब्दांत गाढवे यांनी जाधव यांना सज्जड दमच दिला. एखादी शासकीय अधिकारी आपली जबाबदारी पार पाडत नसेल तर त्याची तक्रार करणे गुन्हा आहे का ? अतिक्रमण हटवायची मागणी करणे गुन्हा आहे का ? साहिल गाढवे जनतेची कामे करण्यासाठी आहेत की, जनतेवर मनमानी करण्यासाठी…खोपोली नगर परिषद खरंच लोकशाही देशात आहे की, हुकुमशाही देशात, असा प्रश्न नागरीकांमधून उपस्थित केला जात आहे.

पत्रकार शिवाजी जाधव यांनी या अतिक्रमणाविरोधात वेळोवेळी खोपोली नगरपालिकेकडे लेखी आणि तोंडी स्वरूपात पाठपुरावा केला होता. मात्र, सहाय्यक नगररचना अधिकारी गाढवे यांनी पोलिस संरक्षण घ्यावे लागेल, उद्या कारवाई करतो, चार दिवसांनी येतो, अशा उडवाउडवीची कारणे देत सातत्याने कार्रवाई टाळली आहे. विशेष म्हणजे, सात दिवसांची नोटीस देऊनही तब्बल सात महिने उलटून गेले तरीही अद्याप अतिक्रमण हटविण्यात आले नाही. उलट तक्रार केली म्हणून आता कार्रवाई करणार नाही, अशी मुजोरी सुरू केली आहे.

या अकार्यक्षमतेच्या विरोधात पत्रकार शिवाजी जाधव यांनी कोकण आयुक्त कार्यालयात तसेच अलिबाग नगर परिषदेच्या अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली आहे. अलिबाग येथील नगर परिषद अधिकाऱ्यांनी सदर सर्व कागदपत्रे मुख्याधिकारी पाटील यांच्याकडे सादर करण्यास सांगितले. त्यानंतर पाटील यांनी विभागीय चौकशी लावण्याचे निर्देश दिले आहेत, पण अद्याप त्याबाबत हालचाल झाली नसल्याचे दिसून येत आहे. या कारवाईमुळे खोपोली नगरपालिकेतील प्रशासनिक प्रक्रियेतील हलगर्जीपणावर प्रकाश पडला असून, भविष्यातील अतिक्रमणविरोधी कारवाई अधिक गतिमान होईल, अशी अपेक्षा नागरिकांमधून व्यक्त होत आहे.