माणगाव शिवसत्ता टाइम्स (नरेश पाटील):-
माणगाव तालुक्यातील गारळ गावच्या हद्दीत,गोवा-मुंबई राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ व मुगवली फाट्यानजीक मंगळवारी रात्री साडेआठच्या सुमारास एक दुर्दैवी अपघात घडला. अज्ञात राखाडी रंगाच्या मारुती इको गाडीने भरधाव वेगात होंडा अॅक्टीव्हा स्कूटीला पाठीमागून जोरात धडक दिली. या अपघातात १८ वर्षीय सलोनी संजय भोसले हिचा मृत्यू झाला असून, दोन जण गंभीर जखमी झाले आहेत.
अपघातग्रस्त स्कूटी (क्रमांक MH-06-CR-5923) वर सलोनी भोसले व्यतिरिक्त वैभव सुभाष भोजने (२५) व जान्हवी संतोष उंडरे (१८) हे देखील होते. स्कूटी वळण घेत असताना अज्ञात वाहन चालकाने मागून जोरात धडक दिली.अपघातानंतर चालक गाडी घेऊन पसार झाला असून वाहनाचा क्रमांक अद्याप अस्पष्ट आहे.
सध्या उन्हाळी सुट्ट्यांचा हंगाम सुरू असल्याने १ मे २०२५ पासून मुंबई-गोवा महामार्गावर वाहनांची मोठी वर्दळ वाढली आहे. खास करून विकेंड व सुट्ट्यांच्या काळात महामार्गावर प्रचंड वाहतूक होत असून, अनेक ठिकाणी वाहतूक कोंडीही निर्माण झाली आहे. अपघात घडलेल्या गारळ परिसरातही वाहनांची सतत गर्दी दिसून येते. अशा परिस्थितीत वाहनचालकांनी अधिक काळजी घेण्याची गरज आहे.
अपघातात गंभीर जखमी झालेल्या वैभव भोजने यांच्या फिर्यादीवरून माणगाव पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत कलम १०६(१), २८१, १२५ (अ), १२५ (ब) व मोटार वाहन कायदा कलम १८४, १३४ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.फॉरेन्सिक पथकाने घटनास्थळी भेट दिलेली नसली तरी माणगावचे उपविभागीय पोलीस अधिकारी पुष्कराज सूर्यवंशी, पोनि बोराडे व तपासी अधिकारी पोसई काळे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.पोलीस तपास सुरू असून अज्ञात वाहनचालकाचा शोध घेतला जात आहे.
अपघातग्रस्त स्कूटी (क्रमांक MH-06-CR-5923) वर सलोनी भोसले व्यतिरिक्त वैभव सुभाष भोजने (२५) व जान्हवी संतोष उंडरे (१८) हे देखील होते. स्कूटी वळण घेत असताना अज्ञात वाहन चालकाने मागून जोरात धडक दिली.अपघातानंतर चालक गाडी घेऊन पसार झाला असून वाहनाचा क्रमांक अद्याप अस्पष्ट आहे.
सध्या उन्हाळी सुट्ट्यांचा हंगाम सुरू असल्याने १ मे २०२५ पासून मुंबई-गोवा महामार्गावर वाहनांची मोठी वर्दळ वाढली आहे. खास करून विकेंड व सुट्ट्यांच्या काळात महामार्गावर प्रचंड वाहतूक होत असून, अनेक ठिकाणी वाहतूक कोंडीही निर्माण झाली आहे. अपघात घडलेल्या गारळ परिसरातही वाहनांची सतत गर्दी दिसून येते. अशा परिस्थितीत वाहनचालकांनी अधिक काळजी घेण्याची गरज आहे.
अपघातात गंभीर जखमी झालेल्या वैभव भोजने यांच्या फिर्यादीवरून माणगाव पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत कलम १०६(१), २८१, १२५ (अ), १२५ (ब) व मोटार वाहन कायदा कलम १८४, १३४ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.फॉरेन्सिक पथकाने घटनास्थळी भेट दिलेली नसली तरी माणगावचे उपविभागीय पोलीस अधिकारी पुष्कराज सूर्यवंशी, पोनि बोराडे व तपासी अधिकारी पोसई काळे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.पोलीस तपास सुरू असून अज्ञात वाहनचालकाचा शोध घेतला जात आहे.